शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे दौंडमध्ये बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 21:05 IST

वंचित बहुजन आघाडीने केले ठिय्या आंदोलन..

दौंड (पुणे) :पुणे येथील सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे दौंड येथील अष्टविनायक महामार्गावरील नादुरुस्त चेंबरमध्ये पडून अनुष चव्हाण ( वय १२, रा. गोवा गल्ली, दौंड) या मुलाला जीव गमवावा लागला. दरम्यान, मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी केले असून, ठिय्या आंदोलनासह रास्ता रोकोही केला.

दौंड येथील नेहरू चौकात अष्टविनायक महामार्गावरील नादुरुस्त चेंबर असून, या चेंबरमध्ये अल्पवयीन मुलगा पडला आणि त्याच्या पायावरून उसाचा ट्रॅक्टर गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

नेहरू चौक ते गोवा गल्ली दरम्यान अष्टविनायक महामार्गावर ड्रेनेज लाईनचा चेंबर फुटलेला असून, या ठिकाणी वारंवार अपघात झालेले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना आणि लेखी स्वरूपात निवेदन दिलेले होते. मात्र, याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने त्यातच ठेकेदारावर अंकुश नसल्यामुळे दौंड शहरात अष्टविनायक महामार्गाचे काम ढिसाळ पद्धतीने झालेले आहे. या कामाची चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने केलेली आहे. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अश्विन वाघमारे, भीम क्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी वाघमारे, रितेश सोनवणे, तुषार जाधव, यश भालसेन, करण खाडे, चांद बादशाह शेख, श्रीनाथ ननवर आदी उपस्थित होते.

बालकाचा मृत्यू झाला नसता

दौंड येथील नेहरू चौक परिसरात एक धोकादायक चेंबर असून, या चेंबरच्या खड्ड्यात दुचाकीस्वार, पादचारी पडून अपघात झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने, दुर्लक्ष केले. परिणामी अधिकाऱ्यांचे आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नादुरुस्त चेंबरच्या खड्ड्यात वंचित बहुजन आघाडी आणि भीम क्रांती सेनेने वृक्षारोपण केले होते. जर वेळीच हे खड्डे दुरुस्त केले असते तर एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता.

शासनाला शहाणपणा येईल का?

अनुष् चव्हाण या अल्पवयीन मुलाचे आई-वडील यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. दरम्यान, त्याचा सांभाळ त्याची आजी करत होती. परंतु, काळाच्या ओघाने आणि शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता तरी शासनला शहाणपणा येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdaund-acदौंड