शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक प्रकल्पातील स्फोटाने अस्वस्थ कुरकुंभ ! अपघाताच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:47 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले. दरम्यान, आगीचे स्वरूप जरी कमी असले व त्यातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा अन्य कुठल्याही प्रकारे अनुचित घटना जरी घडली नसली तरी अशी परिस्थिती निर्माण होणेदेखील गंभीर आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक प्रकल्पातील सर्वात मोठे असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपातील रासायनिक कारखाने उभारले गेले आहेत.परिणामी या मोठ्या कारखान्यांमधून होणारे रासायनिक पाण्याचे व वायूचे प्रदूषणदेखील मोठ्या स्वरूपात आहे. जवळपास दोनशे छोटे-मोठे प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित असून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालदेखील होत आहे. कुरकुंभ येथील नागरिकांचे राहणीमान जरी उंचावले असले तरी त्यासोबत प्रदूषण व रासायनिक प्रकल्पातील स्फोटातील अपघाताने मात्र रोजचे जीवनमान अतिशय दहशतीचे करून टाकले आहे.अतिशय घातक रसायने, वायू व त्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे येथील पाणी, हवा दूषित झालेले आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष परिणाम येथील नागरिकांच्या जीवनमानात दिसून येतो आहे. वारंवार होणाºया अपघाताने कित्येक कामगारांनी आपला प्राणदेखील गमावला आहे, मात्र तरीही अपघात ही नित्याचीच बाब झाली असल्याचे पाहावयास मिळते. धुरांच्या लोटाने नागरिकांच्या मनात एक प्रकारे दहशत निर्माण झालेली दिसून येते. कारण कुठल्या प्रकरचा वायू हवेतून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे सांगणे कठीण असते. अपघाताची गंभीरता मोठीअसल्याने सगळीकडे एकच पळापळ उडते. यामध्ये अफवांचे पेवदेखील फुटतात, त्यामुळे भीतीचे वातावरण आणखीच वाढते.कामगारांचीसुरक्षा धोक्यातचघातक प्रक्रिया होत असताना लागणाºया सुरक्षाव्यवस्था या अपुºया आहेत. मोठ्या स्वरूपातील लागलेल्या आगीचे नियंत्रण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. परिणामी जोपर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी येथे पोहोचतात तोपर्यंत होत्याचे नव्हते होऊन जाते. रासायनिक अभिक्रियेत शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखण्याची यंत्रणादेखील कार्यान्वित नाही, त्यामुळे सामान्य कामगाराचा जीव हा अगदीच सामान्य असल्याची पावतीच मिळते. छोट्या उद्योगातून तर सुरक्षेच्या नावालादेखील जागा नसते. नावाला सुरक्षा उपकरणे असतात, मात्र त्याचा उपयोग किती होतो, यावरच प्रश्नचिन्ह आहेत. एकंदरीतच या ठिकाणाच्या सुरक्षा यंत्रणेलाच सुरक्षा पुरवण्याची गरज भासू लागली आहे.नियंत्रणे नाहीतजवळपास हजार एकरपेक्षा जास्त जागेत बसलेल्या या औद्योगिक प्रकल्पात दोनशे उद्योग आहेत, तरीदेखील यांच्यावर नियंत्रण करणाºया यंत्रणा या पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी शहरात असतात. त्यामुळे हे नियंत्रण फक्त नावालाच आहे.उत्पादनवाढीकडे लक्षकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये रासायनिक प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घातक रासायनिक प्रयोगांना महत्त्व दिले जाते. ही रसायने अतिशय महाग असल्याने कुठल्याही प्रकारे उत्पादन मिळणे हे अत्यंत गरजेचे असते.परिणामी एखाद्या वेळेस यांच्या रासायनिक अभिक्रिया करताना निर्माण झालेल्या अडचणी कामगारांना न सांगताच त्यांच्याकडून, तसेच काम करून घेताना बºयाच वेळा अपघात होतात. काही महाभाग तर प्रकल्प पूर्ण होण्याआधीच उत्पादने घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळेदेखील अपघात झाल्याची घटना या ठिकाणी घटलेल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे