शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

रासायनिक प्रकल्पातील स्फोटाने अस्वस्थ कुरकुंभ ! अपघाताच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:47 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले. दरम्यान, आगीचे स्वरूप जरी कमी असले व त्यातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा अन्य कुठल्याही प्रकारे अनुचित घटना जरी घडली नसली तरी अशी परिस्थिती निर्माण होणेदेखील गंभीर आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक प्रकल्पातील सर्वात मोठे असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपातील रासायनिक कारखाने उभारले गेले आहेत.परिणामी या मोठ्या कारखान्यांमधून होणारे रासायनिक पाण्याचे व वायूचे प्रदूषणदेखील मोठ्या स्वरूपात आहे. जवळपास दोनशे छोटे-मोठे प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित असून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालदेखील होत आहे. कुरकुंभ येथील नागरिकांचे राहणीमान जरी उंचावले असले तरी त्यासोबत प्रदूषण व रासायनिक प्रकल्पातील स्फोटातील अपघाताने मात्र रोजचे जीवनमान अतिशय दहशतीचे करून टाकले आहे.अतिशय घातक रसायने, वायू व त्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे येथील पाणी, हवा दूषित झालेले आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष परिणाम येथील नागरिकांच्या जीवनमानात दिसून येतो आहे. वारंवार होणाºया अपघाताने कित्येक कामगारांनी आपला प्राणदेखील गमावला आहे, मात्र तरीही अपघात ही नित्याचीच बाब झाली असल्याचे पाहावयास मिळते. धुरांच्या लोटाने नागरिकांच्या मनात एक प्रकारे दहशत निर्माण झालेली दिसून येते. कारण कुठल्या प्रकरचा वायू हवेतून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे सांगणे कठीण असते. अपघाताची गंभीरता मोठीअसल्याने सगळीकडे एकच पळापळ उडते. यामध्ये अफवांचे पेवदेखील फुटतात, त्यामुळे भीतीचे वातावरण आणखीच वाढते.कामगारांचीसुरक्षा धोक्यातचघातक प्रक्रिया होत असताना लागणाºया सुरक्षाव्यवस्था या अपुºया आहेत. मोठ्या स्वरूपातील लागलेल्या आगीचे नियंत्रण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. परिणामी जोपर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी येथे पोहोचतात तोपर्यंत होत्याचे नव्हते होऊन जाते. रासायनिक अभिक्रियेत शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखण्याची यंत्रणादेखील कार्यान्वित नाही, त्यामुळे सामान्य कामगाराचा जीव हा अगदीच सामान्य असल्याची पावतीच मिळते. छोट्या उद्योगातून तर सुरक्षेच्या नावालादेखील जागा नसते. नावाला सुरक्षा उपकरणे असतात, मात्र त्याचा उपयोग किती होतो, यावरच प्रश्नचिन्ह आहेत. एकंदरीतच या ठिकाणाच्या सुरक्षा यंत्रणेलाच सुरक्षा पुरवण्याची गरज भासू लागली आहे.नियंत्रणे नाहीतजवळपास हजार एकरपेक्षा जास्त जागेत बसलेल्या या औद्योगिक प्रकल्पात दोनशे उद्योग आहेत, तरीदेखील यांच्यावर नियंत्रण करणाºया यंत्रणा या पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी शहरात असतात. त्यामुळे हे नियंत्रण फक्त नावालाच आहे.उत्पादनवाढीकडे लक्षकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये रासायनिक प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घातक रासायनिक प्रयोगांना महत्त्व दिले जाते. ही रसायने अतिशय महाग असल्याने कुठल्याही प्रकारे उत्पादन मिळणे हे अत्यंत गरजेचे असते.परिणामी एखाद्या वेळेस यांच्या रासायनिक अभिक्रिया करताना निर्माण झालेल्या अडचणी कामगारांना न सांगताच त्यांच्याकडून, तसेच काम करून घेताना बºयाच वेळा अपघात होतात. काही महाभाग तर प्रकल्प पूर्ण होण्याआधीच उत्पादने घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळेदेखील अपघात झाल्याची घटना या ठिकाणी घटलेल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे