शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

रासायनिक प्रकल्पातील स्फोटाने अस्वस्थ कुरकुंभ ! अपघाताच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:47 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले.

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले. दरम्यान, आगीचे स्वरूप जरी कमी असले व त्यातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा अन्य कुठल्याही प्रकारे अनुचित घटना जरी घडली नसली तरी अशी परिस्थिती निर्माण होणेदेखील गंभीर आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक प्रकल्पातील सर्वात मोठे असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपातील रासायनिक कारखाने उभारले गेले आहेत.परिणामी या मोठ्या कारखान्यांमधून होणारे रासायनिक पाण्याचे व वायूचे प्रदूषणदेखील मोठ्या स्वरूपात आहे. जवळपास दोनशे छोटे-मोठे प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित असून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालदेखील होत आहे. कुरकुंभ येथील नागरिकांचे राहणीमान जरी उंचावले असले तरी त्यासोबत प्रदूषण व रासायनिक प्रकल्पातील स्फोटातील अपघाताने मात्र रोजचे जीवनमान अतिशय दहशतीचे करून टाकले आहे.अतिशय घातक रसायने, वायू व त्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे येथील पाणी, हवा दूषित झालेले आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष परिणाम येथील नागरिकांच्या जीवनमानात दिसून येतो आहे. वारंवार होणाºया अपघाताने कित्येक कामगारांनी आपला प्राणदेखील गमावला आहे, मात्र तरीही अपघात ही नित्याचीच बाब झाली असल्याचे पाहावयास मिळते. धुरांच्या लोटाने नागरिकांच्या मनात एक प्रकारे दहशत निर्माण झालेली दिसून येते. कारण कुठल्या प्रकरचा वायू हवेतून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे सांगणे कठीण असते. अपघाताची गंभीरता मोठीअसल्याने सगळीकडे एकच पळापळ उडते. यामध्ये अफवांचे पेवदेखील फुटतात, त्यामुळे भीतीचे वातावरण आणखीच वाढते.कामगारांचीसुरक्षा धोक्यातचघातक प्रक्रिया होत असताना लागणाºया सुरक्षाव्यवस्था या अपुºया आहेत. मोठ्या स्वरूपातील लागलेल्या आगीचे नियंत्रण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. परिणामी जोपर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी येथे पोहोचतात तोपर्यंत होत्याचे नव्हते होऊन जाते. रासायनिक अभिक्रियेत शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखण्याची यंत्रणादेखील कार्यान्वित नाही, त्यामुळे सामान्य कामगाराचा जीव हा अगदीच सामान्य असल्याची पावतीच मिळते. छोट्या उद्योगातून तर सुरक्षेच्या नावालादेखील जागा नसते. नावाला सुरक्षा उपकरणे असतात, मात्र त्याचा उपयोग किती होतो, यावरच प्रश्नचिन्ह आहेत. एकंदरीतच या ठिकाणाच्या सुरक्षा यंत्रणेलाच सुरक्षा पुरवण्याची गरज भासू लागली आहे.नियंत्रणे नाहीतजवळपास हजार एकरपेक्षा जास्त जागेत बसलेल्या या औद्योगिक प्रकल्पात दोनशे उद्योग आहेत, तरीदेखील यांच्यावर नियंत्रण करणाºया यंत्रणा या पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी शहरात असतात. त्यामुळे हे नियंत्रण फक्त नावालाच आहे.उत्पादनवाढीकडे लक्षकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये रासायनिक प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घातक रासायनिक प्रयोगांना महत्त्व दिले जाते. ही रसायने अतिशय महाग असल्याने कुठल्याही प्रकारे उत्पादन मिळणे हे अत्यंत गरजेचे असते.परिणामी एखाद्या वेळेस यांच्या रासायनिक अभिक्रिया करताना निर्माण झालेल्या अडचणी कामगारांना न सांगताच त्यांच्याकडून, तसेच काम करून घेताना बºयाच वेळा अपघात होतात. काही महाभाग तर प्रकल्प पूर्ण होण्याआधीच उत्पादने घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळेदेखील अपघात झाल्याची घटना या ठिकाणी घटलेल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे