शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

धर्मादाय आयुक्तालय लावणार गरिबा घरचे लग्न, शिवकुमार डिगे यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:40 AM

शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आणि गरिबांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी धर्मादाय निधीतून केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्तालयाने याबाबत पुढाकार घेतला असून, त्यासाठी खास जिल्हानिहाय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक धर्मादाय संस्थेला या समितीला निधी द्यावा लागेल असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे - शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आणि गरिबांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी धर्मादाय निधीतून केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्तालयाने याबाबत पुढाकार घेतला असून, त्यासाठी खास जिल्हानिहाय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक धर्मादाय संस्थेला या समितीला निधी द्यावा लागेल असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी तसे परिपत्रक काढले आहे. राज्यातील विविध धर्मादाय संस्थांकडे काही लाखांपासून ते कोटी रुपयांपर्यंत निधी शिल्लक आहे. विविध धर्मादाय संस्थांचा निधी हा समाजोपयोगी कामासाठी खर्च झाला पाहिजे. अनेक संस्था शिक्षण आणि वैद्यकीय कारणासाठी हा निधी खर्च देखील करतात. मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यात मुलीच्या लग्नाची चिंता हेदेखील एक कारण आहे. धर्मादाय निधीचा उपयोग जर गरीब शेतकºयांच्या मुलींच्या लग्नासाठी झाल्यास त्याचा समाजाला चांगला उपयोग होईल. शेतकी आत्महत्येच्या घटनांतही त्यामुळे घट होईल. तसेच गरिबांमध्ये आपलादेखील कोणी विचार करणारा घटक समाजामध्ये आहे, असा संदेश त्यामुळे जाईल. गरिबांचे सामुदायिक विवाह मुख्य उद्देशमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५०नुसार सार्वजनिक हितासाठी निधीचा वापर करता येऊ शकतो. गरिबांचे सामुदायिक विवाह हा देखील धर्मादायचा उद्देश आहे. त्यासाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करण्यात यावी. त्यात प्रत्येक धार्मिकस्थळांचे एक विश्वस्थ, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांतील विश्वस्तांचा समावेश करता येईल.सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यातील धर्मादाय उप आयुक्त अथवा सहायक धर्मादाय आयुक्तांना राहील. या समितीची नोंदणी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत करावी. त्याचे खाते बँकेत उघडावे.धर्मादाय संस्थांमध्ये जमा झालेल्या निधीपैकी काही सामुदायिक विवाहासाठी घ्यावा. त्यानंतर गरीब घटकांना मुलींच्या विवाहासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करावे. त्यानुसार सामुदायिक विवाह करावा, असे परिपत्रक डिगे यांनी काढले आहे.

टॅग्स :Puneपुणे