शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 02:43 IST

Air India Plane Crash in Kerla, Latest News एअर मार्शल भूषण गोखले : कोझिकोडे येथे आधीही झाल्या आहेत दुर्घटना

पुणे : कोझिकोडे येथील विमानतळावर झालेला अपघात दुर्देवी आहे. साधारणत: विमानतळाच्या धावपट्टीवर साचलेल्या पाण्यामुळे विमानाचे ब्रेक योग्य प्रकारे लागत नाहीत. केरळ येथील हवामान खराब असल्याने तसेच धावपट्टीवर पाणी साचल्याने ब्रेक लागूनही विमान घसरल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे, असे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितले.

यापूर्वी मंगळूर येथे २०१० मध्ये झालेल्या विमान अपघाताची चौकशी गोखले यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. ते म्हणाले, विमानतळाच्या धावपट्टीवरील साचलेले पाणी निघून गेलेले नाही. विमानतळावरील ड्रेनेज सिस्टिीम खराब असल्याने पाणी साचून राहिले. यामुळे विमानाचे ब्रेक लागले नाहीत. यामुळे विमान घसरून अपघात झाला. कोझिकोड येथील अपघातातील वैमानिक दीपक साठे हे हवाई दलातील अनुभवी वैमानिक होते. त्यांचा एअर इंडियातील अनुभवही मोठा आहे. त्यामुळे त्यांनी विमान योग्य पद्धतीने हाताळले असणार आहे. या अपघाताची कारणे शोधावी लागणार आहेत, असेही गोखले म्हणाले.वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यूमुंबई : केरळमध्ये कोझिकोड येथे शुक्रवारी सायंकाळी एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातात मुख्य वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. ते अनुभवी वैमानिक होते. ते मूळचे मुंबईतील आहेत. साठे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ५८ व्या तुकडीचे विद्यार्थी होते. यानंतर एअर फोर्स अकादमीतून त्यांनी १९८१ साली वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९९१ ते २००३ या कालावधीत मिलिटरी एव्हिएशनमध्ये ते एक्सपेरीमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम पाहत होते. त्यांना ‘सॉर्ड आॅफ आॅनर’ने सन्मानित करण्यात आले होते. ३० जून २००३ रोजी लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते एअर इंडियात वैमानिक म्हणून दाखल झाले.अतिशय उत्कृष्ट आणि अनुभवी वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती. विंग कमांडर दीपक साठेदुर्घटनेमुळे व्यथित-रामनाथ कोविंदविमान अपघाताबाबत ऐकून आपण व्यथित झालो असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, विमानातील जखमी प्रवासी, चालक दलाचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. मी केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांच्याशी बोललो आहे आणि माहिती घेतली आहे.भारतातील मोठे विमान अपघात१९५८ : गुडगावमध्ये (आता गुरुग्राम) विमान अपघातात ४ जणांचा मृत्यू७ जुलै १९६२ : एलिटालिया फ्लाइट ७७७ मुंबईत पहाडी भागात धडकले. ९४ जणांचा मृत्यू.२८ जुलै १९६३ : यूएईच्या विमानाचा मुंबईत अपघात : ६३ ठार.१९ सप्टेंबर १९६५ : सीमेवर पाकिस्तानने भारतीय नागरी विमान पाडले. ८ जणांचा मृत्यू.१४ जून १९७२ : जपान एअरलाइन्सचे विमान दिल्लीत विमानतळावर कोसळले. ८५ जणांचा मृत्यू.३१ मे १९७३ : दिल्ली विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. ४८ जणांचा मृत्यू.१२ आॅक्टोबर १९७६ : मुंबईत इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला आग, ९५ मृत्युमुखी.१ जानेवारी १९७८ : एअर इंडियाचे विमान मुंबईत बांद्रा किनाऱ्यालगत कोसळले. २१३ जणांचा मृत्यू.२१ जून १९८२ : मुंबईच्या सहार विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात. १७ मृत्युमुखी.१९ आॅक्टोबर १९८८ : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला अहमदाबादेत अपघात, १३३ जणांचा मृत्यू.१४ फेब्रुवारी १९९० : इंडियन एअरलाइन्सचे विमान बंगळुरुत कोसळले. ९२ जणांचा मृत्यू.१६ जुलै १९९१ : इंफाळमध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. सर्व ६९ प्रवाशांचा मृत्यू.२६ एप्रिल १९९३ : इंडियन एअरलाइन्सचे विमान महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये रनवेवरुन उड्डाणानंतर ट्रकला धडकले. ५५ प्रवाशांचा मृत्यू.१२ नोव्हेंबर १९९६ : सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानाची कझाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाशी हवेत धडक़ ३४९ लोकांचा मृत्यू.१७ जुलै २००० : पाटण्यात एलायन्स एअर विमानाला अपघात, ६० मृत्युमुखी.२२ मे २०१० : एअर इंडिया एक्सप्रेस विमान मेंगळुरु एअरपोर्टवर कोसळले. १५८ प्रवाशांचा मृत्यू.

टॅग्स :airplaneविमानPuneपुणेKeralaकेरळ