शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 02:43 IST

Air India Plane Crash in Kerla, Latest News एअर मार्शल भूषण गोखले : कोझिकोडे येथे आधीही झाल्या आहेत दुर्घटना

पुणे : कोझिकोडे येथील विमानतळावर झालेला अपघात दुर्देवी आहे. साधारणत: विमानतळाच्या धावपट्टीवर साचलेल्या पाण्यामुळे विमानाचे ब्रेक योग्य प्रकारे लागत नाहीत. केरळ येथील हवामान खराब असल्याने तसेच धावपट्टीवर पाणी साचल्याने ब्रेक लागूनही विमान घसरल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे, असे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितले.

यापूर्वी मंगळूर येथे २०१० मध्ये झालेल्या विमान अपघाताची चौकशी गोखले यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. ते म्हणाले, विमानतळाच्या धावपट्टीवरील साचलेले पाणी निघून गेलेले नाही. विमानतळावरील ड्रेनेज सिस्टिीम खराब असल्याने पाणी साचून राहिले. यामुळे विमानाचे ब्रेक लागले नाहीत. यामुळे विमान घसरून अपघात झाला. कोझिकोड येथील अपघातातील वैमानिक दीपक साठे हे हवाई दलातील अनुभवी वैमानिक होते. त्यांचा एअर इंडियातील अनुभवही मोठा आहे. त्यामुळे त्यांनी विमान योग्य पद्धतीने हाताळले असणार आहे. या अपघाताची कारणे शोधावी लागणार आहेत, असेही गोखले म्हणाले.वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यूमुंबई : केरळमध्ये कोझिकोड येथे शुक्रवारी सायंकाळी एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातात मुख्य वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. ते अनुभवी वैमानिक होते. ते मूळचे मुंबईतील आहेत. साठे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ५८ व्या तुकडीचे विद्यार्थी होते. यानंतर एअर फोर्स अकादमीतून त्यांनी १९८१ साली वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९९१ ते २००३ या कालावधीत मिलिटरी एव्हिएशनमध्ये ते एक्सपेरीमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम पाहत होते. त्यांना ‘सॉर्ड आॅफ आॅनर’ने सन्मानित करण्यात आले होते. ३० जून २००३ रोजी लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते एअर इंडियात वैमानिक म्हणून दाखल झाले.अतिशय उत्कृष्ट आणि अनुभवी वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती. विंग कमांडर दीपक साठेदुर्घटनेमुळे व्यथित-रामनाथ कोविंदविमान अपघाताबाबत ऐकून आपण व्यथित झालो असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, विमानातील जखमी प्रवासी, चालक दलाचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. मी केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांच्याशी बोललो आहे आणि माहिती घेतली आहे.भारतातील मोठे विमान अपघात१९५८ : गुडगावमध्ये (आता गुरुग्राम) विमान अपघातात ४ जणांचा मृत्यू७ जुलै १९६२ : एलिटालिया फ्लाइट ७७७ मुंबईत पहाडी भागात धडकले. ९४ जणांचा मृत्यू.२८ जुलै १९६३ : यूएईच्या विमानाचा मुंबईत अपघात : ६३ ठार.१९ सप्टेंबर १९६५ : सीमेवर पाकिस्तानने भारतीय नागरी विमान पाडले. ८ जणांचा मृत्यू.१४ जून १९७२ : जपान एअरलाइन्सचे विमान दिल्लीत विमानतळावर कोसळले. ८५ जणांचा मृत्यू.३१ मे १९७३ : दिल्ली विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. ४८ जणांचा मृत्यू.१२ आॅक्टोबर १९७६ : मुंबईत इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला आग, ९५ मृत्युमुखी.१ जानेवारी १९७८ : एअर इंडियाचे विमान मुंबईत बांद्रा किनाऱ्यालगत कोसळले. २१३ जणांचा मृत्यू.२१ जून १९८२ : मुंबईच्या सहार विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात. १७ मृत्युमुखी.१९ आॅक्टोबर १९८८ : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला अहमदाबादेत अपघात, १३३ जणांचा मृत्यू.१४ फेब्रुवारी १९९० : इंडियन एअरलाइन्सचे विमान बंगळुरुत कोसळले. ९२ जणांचा मृत्यू.१६ जुलै १९९१ : इंफाळमध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. सर्व ६९ प्रवाशांचा मृत्यू.२६ एप्रिल १९९३ : इंडियन एअरलाइन्सचे विमान महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये रनवेवरुन उड्डाणानंतर ट्रकला धडकले. ५५ प्रवाशांचा मृत्यू.१२ नोव्हेंबर १९९६ : सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानाची कझाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाशी हवेत धडक़ ३४९ लोकांचा मृत्यू.१७ जुलै २००० : पाटण्यात एलायन्स एअर विमानाला अपघात, ६० मृत्युमुखी.२२ मे २०१० : एअर इंडिया एक्सप्रेस विमान मेंगळुरु एअरपोर्टवर कोसळले. १५८ प्रवाशांचा मृत्यू.

टॅग्स :airplaneविमानPuneपुणेKeralaकेरळ