शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मुठा कालवा बाधितांना निधीचे वाटप करण्याचे अाव्हान जिल्हा प्रशासनासमाेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:41 IST

कालवा बाधितांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या निधीचे वाटप करण्यासाठी केवळ पाच दिवस उरले आहेत.

पुणे : कालवा बाधितांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या निधीचे वाटप करण्यासाठी केवळ पाच दिवस उरले आहेत.त्यामुळे नियोजित वेळत बाधितांना निधीचे वाटप करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. तसेच येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत संबंधित अधिका-यांना निधीच्या वाटपाचा हिशोब आणि उपयोजिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे लागणार आहे.

    दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्यांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सादर करण्यात आला होता. त्यानुसार मंत्रीमंडळ उपसमितीने बाधितांना ३ कोटी रुपये मदत जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले. महसूल व वन विभागातर्फे ४ आॅक्टोबर रोजी यासंदर्भातील अध्यादेश प्रसिध्द करण्यात आला. त्यात प्राथमिक अहवालानुसार केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे ७३० कुटुंबे बाधित झाले असून त्यातील ९० घरे पूर्णत: व ६५० घरांचे अंशत: नुकसान झाले.मात्र,बाधितांची संख्या अधिक असल्याचा दावा स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात आला. मात्र, पंचनाम्यानुसार बाधित असलेल्या अनेक कुटुंबांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही.  शासन आदेशानुसार एका महिन्याच्या आत बाधितांना रक्कमेचे वाटप करणे आवश्यक आहे. तसेच मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर ७ दिवसात शिल्लक राहिलेली संपूर्ण रक्कम शासनास समर्पित करणे बंधनकारक आहे.

    निधी वाटपासाठी देण्यात आलेला एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.मदतीची रक्कम केवळ बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, काही कुटुंबांकडे बँक खाते क्रमांक नसल्यामुळे रक्कम जमा करताना अडचणी येत आहेत,असा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. काही बांधितांकडे राष्ट्रीयकृत व काहींकडे सहकारी बँकांचे खातेक्रमांक असूनही त्यांच्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा केली जात नाही,असे कालवा बाधितांचे म्हणणे आहे.शासन निर्णयानुसार कालवा दूर्घटनेत संपूर्ण घराचे नुकसान झालेले असल्यास अशा बाधित कुटुंबास प्रति कुटुंब ९५ हजार १०० रुपये मदत देणे अपेक्षित आहे. संपूर्णत: नुकसान झालेली कच्ची घरे, झोपड्या यांच्या पंचनाम्यानुसार निश्चित झालेली प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये रक्कम मदत म्हणून देण्याचे अध्यादेशात स्पष्ट केले आहे. किमान १५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात अंशत: नुकसान झालेल्या घरांचे पंचनामेकरून अधिकतम ५० हजार रुपयांपर्यंतच आर्थिक मदत केली जाणार आहे. परंतु,काही बाधित कुटुंबांचेच स्थलांतर करण्यात आले असून निवडक बाधितांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली आहे.

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाWaterपाणी