शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

केंद्र महागाईवर नियंत्रणासाठी प्रयत्नशील; मात्र राज्य सरकारनेही जबाबदारी घ्यावी-अश्वीनकुमार चौबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 19:42 IST

रशिया युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोय

पुणे : रशिया युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत, मात्र ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री अश्वीनकुमार चौबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्ता बैठकीसाठी शुक्रवारी चौबे आले होते. तत्पुर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी महागाई कमी करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असल्याचे सांगितले. युद्धामुळे जगातील सर्वच देशांमध्ये महागाई वाढली आहे, भारत त्याला अपवाद असणार नाही. इथेही वाढते आहे, त्यावर आम्ही नियंत्रण मिळवतो आहोत. त्यासाठी काही गट स्थापन केले आहेत. पण राज्य सरकारांचीही यात मोठी जबाबदारी आहे. काही कर कमी करून ते यावर नियंत्रण ठेवू शकतात.

खाद्य तेल, गॅसच्या दरांवर नियंत्रण आणतो आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपण बाहेरून घेत असतो. त्यामुळे या प्रयत्नांना मर्यादा येतात. शिधापत्रिकेवर धान्य व्यवस्थित कसे मिळेल यासाठी आपण बायोमेट्रिक पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे या योजनेतील भ्रष्टाचाराला आळा बसला असा दावा चौबे यांनी केला. धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध राहतील, त्याचा कोणी साठा करणार नाही याची काळजी घेत आहोत. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे कळवण्यात आले आहे असे चौबे यांनी सांगितले.

बिहारमधील भाजपाच्या सत्तेत तिथे कोणीही एकत्र आले तरीही काही फरक पडत नाही. कोणकोणाला भेटत असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. ती चांगलीच गोष्ट आहे, मात्र त्यामुळे भाजपाच्या तेथील सत्तेमध्ये बदल होईल, काही उलथापालथ होईल असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे असे चौबे म्हणाले.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाState Governmentराज्य सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMONEYपैसा