शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

परीक्षा रद्द केल्याने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST

विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांना वेगळेच स्थान आहे. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे उचित नाही. ...

विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांना वेगळेच स्थान आहे. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे उचित नाही. इयत्ता दहावीच्या गुणांवर आयटीआय पॉलिटेक्निक आणि इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जातो. परीक्षाच झाल्या नाहीत, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा द्यायचा? असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयामुळे निर्माण होणा-या समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असेही शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश पूर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागू शकते. मात्र, प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याऐवजी दहावीची लेखी परीक्षा घेणेच उचित ठरेल, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

-------------------

राज्य शासनाने सध्या केवळ परीक्षा पुढे ढकल्या आहेत. त्या रद्द केल्या नाहीत. त्यामुळे याबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु, सीबीएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे निश्चितच त्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेश याबाबत अडचणी येऊ शकतात. या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षांना सामोरे जावे लागू शकते.

- एन. के. जरग, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

-----------------

राज्य शासन एसएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार याबाबत वाट पाहावी लागणार आहे. परंतु, सीबीएसई प्रमाणे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. कदाचित दहावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षांच्या पर्यायचा विचार करावा लागेल.

- गंगाधर म्हमाणे, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य