शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"मामला 'गंभीर' है..."! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
3
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
4
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
5
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
6
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
7
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
8
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
9
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
10
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
11
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
12
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
13
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
14
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
15
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
16
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
17
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
18
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
19
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
20
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्द केल्याने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST

विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांना वेगळेच स्थान आहे. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे उचित नाही. ...

विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांना वेगळेच स्थान आहे. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे उचित नाही. इयत्ता दहावीच्या गुणांवर आयटीआय पॉलिटेक्निक आणि इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जातो. परीक्षाच झाल्या नाहीत, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा द्यायचा? असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयामुळे निर्माण होणा-या समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असेही शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश पूर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागू शकते. मात्र, प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याऐवजी दहावीची लेखी परीक्षा घेणेच उचित ठरेल, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

-------------------

राज्य शासनाने सध्या केवळ परीक्षा पुढे ढकल्या आहेत. त्या रद्द केल्या नाहीत. त्यामुळे याबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु, सीबीएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे निश्चितच त्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेश याबाबत अडचणी येऊ शकतात. या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षांना सामोरे जावे लागू शकते.

- एन. के. जरग, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

-----------------

राज्य शासन एसएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार याबाबत वाट पाहावी लागणार आहे. परंतु, सीबीएसई प्रमाणे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. कदाचित दहावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षांच्या पर्यायचा विचार करावा लागेल.

- गंगाधर म्हमाणे, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य