शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

Rupee Bank: रूपी बँकेचा परवाना रद्द! पुण्यातील साडेचार हजार ज्येष्ठांचे '३५० कोटी बुडाले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:22 IST

बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही

पुणे : रूपी बँकेचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मोकळी झाली खरी. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे ४ हजार ५०० ज्येष्ठ नागरिकांचे तब्बल ३५० कोटी रूपये बुडीत खाती जमा होणार आहेत. यातील बहुतेकांचा निवृत्तीकाल या बँकेत ठेवलेल्या या ठेवींच्या व्याजावरच सुरू होता. आता व्याजही गेले व पैसेही गेले अशी वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या रूपी सहकारी बँकेचा व्यवसाय करण्याचा परवाना अखेर आरबीआयने २२ सप्टेंबर २०२२ नंतर रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. सहकार आयुक्तांकडून आता त्यासाठी एका अधिकाऱ्याची किंवा एखाद्या समितीची नियुक्ती केली जाईल. ही समिती बँकेचे आर्थिक मूल्यमापन करेल. त्यानंतर त्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्याआधी ठेव सुरक्षा विमा महामंडळाचे पैसे ते काढून घेतील.

ठेव सुरक्षा महामंडळाने ६४ हजार ठेवीदारांना कमाल ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत केली आहे. म्हणजे १ कोटी रुपये ठेव असली तरीही त्या ठेवीदाराला ५ लाख रुपयेच मिळाले आहेत. ५ लाखांपेक्षा कमी ठेव असेल तर त्याची जेवढी रक्कम आहे ती परत करण्यात आली आहे. परत करण्यात आलेली ही रक्कम ७०० कोटी रुपयांची आहे असे बँकेच्या प्रशासक मंडळाकडूनच अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

बँकेत ८४० कोटीच शिल्लक

बँकेत आता ८४० कोटी रुपये शिल्लक आहेत. बँकेची मालमत्ता ८० कोटी रुपयांची आहे. वर्ष-दोन वर्षांत हमखास कर्ज वसूल होईल अशी रक्कम १०० कोटी रुपयांची आहे. दिवाळखोरी जाहीर झाली की, यातून ठेव सुरक्षा विमा महामंडळ सर्वप्रथम त्यांनी दिलेले ७०० कोटी रुपये काढून घेईल. त्यानंतर जमा रकमेतून इतर देणी भागवली जातील. त्यानंतर उर्वरित ठेवीदारांना त्यांची ठेव परत करण्यासाठी बँकेकडे पैसेच राहणार नाहीत, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

१ कोटींची ठेवी असलेले अनेकजण

मोठ्या रकमेच्या ठेवी असलेले बँकेचे तब्बल ४ हजार ५०० ठेवीदार आहेत. त्यांचीच एकत्रित रक्कम ३५० कोटी रुपये इतकी आहे. बँकेची मालमत्ता तसेच शिल्लक पैसे अन्य कारणांसाठी वापरले गेले तर या ठेवीदारांचे पैसे कशातूनच देता येणे शक्य होणार नाही. यात १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेले अनेक ठेवीदार आहेत. त्याशिवाय २० लाखांपासून पुढील रकमेच्या ठेवी असणारेही अनेकजण आहेत.

आता सर्व पैसे गेले

बहुसंख्य ठेवीदार ज्येष्ठ नागरिक आहेत. नोकरीतील किंवा व्यवसायातील निवृत्तीनंतर साठवलेली रक्कम त्यांनी ठेव म्हणून बँकेत ठेवली. त्यापासून मिळणाऱ्या व्याजावरच त्यांचा निर्वाह सुरू होता. त्यालाच आता खीळ बसली आहे. तशी तर ती बँक आर्थिक अडचणीत आली तेव्हापासूनच बसली होती. मात्र, काहीतरी आशा होती. तीसुद्धा आता संपुष्टात आली आहे. हे पैसे त्यांनी बुडीतच समजावेत, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकMONEYपैसाSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिक