शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Rupee Bank: रूपी बँकेचा परवाना रद्द! पुण्यातील साडेचार हजार ज्येष्ठांचे '३५० कोटी बुडाले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:22 IST

बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही

पुणे : रूपी बँकेचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मोकळी झाली खरी. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे ४ हजार ५०० ज्येष्ठ नागरिकांचे तब्बल ३५० कोटी रूपये बुडीत खाती जमा होणार आहेत. यातील बहुतेकांचा निवृत्तीकाल या बँकेत ठेवलेल्या या ठेवींच्या व्याजावरच सुरू होता. आता व्याजही गेले व पैसेही गेले अशी वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या रूपी सहकारी बँकेचा व्यवसाय करण्याचा परवाना अखेर आरबीआयने २२ सप्टेंबर २०२२ नंतर रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. सहकार आयुक्तांकडून आता त्यासाठी एका अधिकाऱ्याची किंवा एखाद्या समितीची नियुक्ती केली जाईल. ही समिती बँकेचे आर्थिक मूल्यमापन करेल. त्यानंतर त्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्याआधी ठेव सुरक्षा विमा महामंडळाचे पैसे ते काढून घेतील.

ठेव सुरक्षा महामंडळाने ६४ हजार ठेवीदारांना कमाल ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत केली आहे. म्हणजे १ कोटी रुपये ठेव असली तरीही त्या ठेवीदाराला ५ लाख रुपयेच मिळाले आहेत. ५ लाखांपेक्षा कमी ठेव असेल तर त्याची जेवढी रक्कम आहे ती परत करण्यात आली आहे. परत करण्यात आलेली ही रक्कम ७०० कोटी रुपयांची आहे असे बँकेच्या प्रशासक मंडळाकडूनच अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

बँकेत ८४० कोटीच शिल्लक

बँकेत आता ८४० कोटी रुपये शिल्लक आहेत. बँकेची मालमत्ता ८० कोटी रुपयांची आहे. वर्ष-दोन वर्षांत हमखास कर्ज वसूल होईल अशी रक्कम १०० कोटी रुपयांची आहे. दिवाळखोरी जाहीर झाली की, यातून ठेव सुरक्षा विमा महामंडळ सर्वप्रथम त्यांनी दिलेले ७०० कोटी रुपये काढून घेईल. त्यानंतर जमा रकमेतून इतर देणी भागवली जातील. त्यानंतर उर्वरित ठेवीदारांना त्यांची ठेव परत करण्यासाठी बँकेकडे पैसेच राहणार नाहीत, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

१ कोटींची ठेवी असलेले अनेकजण

मोठ्या रकमेच्या ठेवी असलेले बँकेचे तब्बल ४ हजार ५०० ठेवीदार आहेत. त्यांचीच एकत्रित रक्कम ३५० कोटी रुपये इतकी आहे. बँकेची मालमत्ता तसेच शिल्लक पैसे अन्य कारणांसाठी वापरले गेले तर या ठेवीदारांचे पैसे कशातूनच देता येणे शक्य होणार नाही. यात १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेले अनेक ठेवीदार आहेत. त्याशिवाय २० लाखांपासून पुढील रकमेच्या ठेवी असणारेही अनेकजण आहेत.

आता सर्व पैसे गेले

बहुसंख्य ठेवीदार ज्येष्ठ नागरिक आहेत. नोकरीतील किंवा व्यवसायातील निवृत्तीनंतर साठवलेली रक्कम त्यांनी ठेव म्हणून बँकेत ठेवली. त्यापासून मिळणाऱ्या व्याजावरच त्यांचा निर्वाह सुरू होता. त्यालाच आता खीळ बसली आहे. तशी तर ती बँक आर्थिक अडचणीत आली तेव्हापासूनच बसली होती. मात्र, काहीतरी आशा होती. तीसुद्धा आता संपुष्टात आली आहे. हे पैसे त्यांनी बुडीतच समजावेत, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकMONEYपैसाSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिक