शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Rupee Bank: रूपी बँकेचा परवाना रद्द! पुण्यातील साडेचार हजार ज्येष्ठांचे '३५० कोटी बुडाले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:22 IST

बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही

पुणे : रूपी बँकेचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मोकळी झाली खरी. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे ४ हजार ५०० ज्येष्ठ नागरिकांचे तब्बल ३५० कोटी रूपये बुडीत खाती जमा होणार आहेत. यातील बहुतेकांचा निवृत्तीकाल या बँकेत ठेवलेल्या या ठेवींच्या व्याजावरच सुरू होता. आता व्याजही गेले व पैसेही गेले अशी वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या रूपी सहकारी बँकेचा व्यवसाय करण्याचा परवाना अखेर आरबीआयने २२ सप्टेंबर २०२२ नंतर रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. सहकार आयुक्तांकडून आता त्यासाठी एका अधिकाऱ्याची किंवा एखाद्या समितीची नियुक्ती केली जाईल. ही समिती बँकेचे आर्थिक मूल्यमापन करेल. त्यानंतर त्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्याआधी ठेव सुरक्षा विमा महामंडळाचे पैसे ते काढून घेतील.

ठेव सुरक्षा महामंडळाने ६४ हजार ठेवीदारांना कमाल ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत केली आहे. म्हणजे १ कोटी रुपये ठेव असली तरीही त्या ठेवीदाराला ५ लाख रुपयेच मिळाले आहेत. ५ लाखांपेक्षा कमी ठेव असेल तर त्याची जेवढी रक्कम आहे ती परत करण्यात आली आहे. परत करण्यात आलेली ही रक्कम ७०० कोटी रुपयांची आहे असे बँकेच्या प्रशासक मंडळाकडूनच अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

बँकेत ८४० कोटीच शिल्लक

बँकेत आता ८४० कोटी रुपये शिल्लक आहेत. बँकेची मालमत्ता ८० कोटी रुपयांची आहे. वर्ष-दोन वर्षांत हमखास कर्ज वसूल होईल अशी रक्कम १०० कोटी रुपयांची आहे. दिवाळखोरी जाहीर झाली की, यातून ठेव सुरक्षा विमा महामंडळ सर्वप्रथम त्यांनी दिलेले ७०० कोटी रुपये काढून घेईल. त्यानंतर जमा रकमेतून इतर देणी भागवली जातील. त्यानंतर उर्वरित ठेवीदारांना त्यांची ठेव परत करण्यासाठी बँकेकडे पैसेच राहणार नाहीत, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

१ कोटींची ठेवी असलेले अनेकजण

मोठ्या रकमेच्या ठेवी असलेले बँकेचे तब्बल ४ हजार ५०० ठेवीदार आहेत. त्यांचीच एकत्रित रक्कम ३५० कोटी रुपये इतकी आहे. बँकेची मालमत्ता तसेच शिल्लक पैसे अन्य कारणांसाठी वापरले गेले तर या ठेवीदारांचे पैसे कशातूनच देता येणे शक्य होणार नाही. यात १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेले अनेक ठेवीदार आहेत. त्याशिवाय २० लाखांपासून पुढील रकमेच्या ठेवी असणारेही अनेकजण आहेत.

आता सर्व पैसे गेले

बहुसंख्य ठेवीदार ज्येष्ठ नागरिक आहेत. नोकरीतील किंवा व्यवसायातील निवृत्तीनंतर साठवलेली रक्कम त्यांनी ठेव म्हणून बँकेत ठेवली. त्यापासून मिळणाऱ्या व्याजावरच त्यांचा निर्वाह सुरू होता. त्यालाच आता खीळ बसली आहे. तशी तर ती बँक आर्थिक अडचणीत आली तेव्हापासूनच बसली होती. मात्र, काहीतरी आशा होती. तीसुद्धा आता संपुष्टात आली आहे. हे पैसे त्यांनी बुडीतच समजावेत, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकMONEYपैसाSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिक