शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

कुकडीच्या सुधारित अहवालास मंत्रीमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 02:10 IST

भूसंपादनाची कामे मार्गी लागणार; धरण गळती, कालवा अस्तरीकरण, चाऱ्या पोटचाºयांचे नियोजन

घोडेगाव : पुणे जिल्ह्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालास मुंबई येथे मंगळवारी (दि.१८) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ३ हजार ९४८.१७ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे डिंभे, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा या धरणांची व त्यांच्या कालव्यांची गेली कित्येक वर्षे बंद पडलेली कामे, रखडलेले भूसंपादन, पुनर्वसनाचे विषय मार्गी लागणार आहेत.कुकडी पाटबंधारे प्रकल्प हा डिंभे, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा या पाच धरणांचा संयुक्त प्रकल्प आहे. या पाच धरणांमध्ये ८६४.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. या प्रकल्पाद्वारे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व सोलापुरजिल्ह्यातील करमाळा अशा सात तालुक्यंतील १,४४,९१२ हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. ७१८.५० किलोमीटर कालव्याद्वारे सिंचनाला पाणी दिले जाते. सिंचनाला पाणी मिळाल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकºयांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.या प्रकल्पातील धरण व कालव्यांची कामे पूर्ण झाली. मात्र कालवे अस्तरीकरण अभावी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नव्हते. तसेच चाºया पोटचाºया, भूसंपादन, पुनर्वसन या कामांसाठी निधीची आवश्यकता होता. तसेच वेळोवेळी प्रकल्पात झालेले बदल त्यामुळे किमतीत वाढ झाली. सन २००४ पासून या प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता मिळावी म्हणून सर्व जण प्रयत्न करत होते.आज दि.१८ रोजी मुंबई येथे मंत्रीमंडळाच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत कुकडी प्रकल्पाचा ३९४८.१७ कोटी इतक्या किमतीचा तृतीय सुधारित प्रशासकिय मान्यता प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्रीमंडळाने बांधकामाची सद्यस्थिती, किंमतवाढीची कारणे, प्रकल्पाची उर्वरीत कामे याचा विचार करून सात तालुक्यांच्या सिंचनास फायदा होणार असल्याने सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकिय मान्यता दिली.यातून धरण सुरक्षा संघटनेने जी कामे प्रस्तावित केली आहेत ती कामे होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कालवाअस्तरीकरणाची कामे होणार असून शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचू शकणार आहे. तसेच गेली कित्येक वर्षे कालवा गळतीमुळे हैराण असलेली गावे व नुकसान होत असलेली शेती यांना फायदा होणार असून कालव्यांची गळती थांबवणार आहे. या निर्णयामुळे डिंभे, माणिकडोह, वडज या धरणांच्या गळतीची कामे पूर्ण होणार तसेच कालवा अस्तरीकरण, चाºया पोटचाºयाची कामे पूर्ण होणार, जमिनी गेलेल्या शेतकºयांना भूसंपादनाचे पैसे मिळणार आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी