शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कोरोनाच्या धास्तीने पुण्यातील आडते बाजार बंदावर ठाम; बैठकीत कोणताही तोडगा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:10 IST

पुणेकरांची अडचण ? आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष

ठळक मुद्दे आडत्यांनी बाजार 31मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

पुणे: कोरोना च्या धास्तीने भाजीपाला,फळे आणि कांदा व बटाटा मार्केट तसेच भूसार व गूळ बाजार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आडते व व्यापारी यांनी घेतला आहे. हा बंद मागे घेण्यासाठी मंगळवारी (दि.24) रोजी बाजार समिती प्रशासनाने संबंधित सर्वांची बैठक घेतली. दोन तास चालेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आडते व व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यामुळे आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.पुण्यातील गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी विभागात दररोज शेतकरी , विक्रेते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी असते. यामुळेच आडत्यांनी बाजार 31मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून बाजार बंद करता येणार नाही असे राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने वारंवार जाहिर केले आहे. तसेच बाजार बंद ठेवला तर परवाने रद्द करण्यात येतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.  कोरोना मुळे संपूर्ण बाजार घटकांमध्ये प्रचंड धास्ती व भितीचे वातावरण आहे. यामुळे बाजार समिती प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी यांनी बैठक घेऊन देखील आडते बंदावर ठाम आहेत. याबाबत नागरिकांच्या सोयीसाठी बाजार समिती प्रशासनाने भाजीपाला वितरणाची सोय करावी, असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. तर आता पुढे काय करता येईल  व नागरिकांच्या सोयीसाठी काय नियोजन करायचे याबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीFarmerशेतकरीbusinessव्यवसाय