शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय कार्यक्रम, वाढदिवसाला बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही; नवी नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 14:36 IST

वाढदिवस, राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढले असून त्यासाठी भरमसाठ बक्षिसेही ठेवली जात होती

मंचर : राज्यातील बैलगाडा शर्यती संदर्भात राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने नव्याने मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या आहेत. त्यानुसार यापुढे यात्रा, जत्रा, उत्सव अशाच बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळणार असून राजकीय कार्यक्रम, वाढदिवस या प्रसंगी आयोजित बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे परंपरागत बैलगाडा शर्यत पार पडणार आहेत. मात्र मागील वर्षभरात परंपरागत यात्रा भरत असताना वाढदिवस तसेच राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी भरमसाठ बक्षिसे ठेवली जात होती. बैलगाडा शर्यतींचा अक्षरशः अतिरेक झाला होता. यावर काही प्रमाणात बंधने असावी अशी बैलगाडा मालकांची इच्छा होती. परंपरेने होणाऱ्या यात्रा कमी मात्र वाढदिवसानिमित्त होणाऱ्या यात्रा जास्त झाल्या होत्या. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. 24 मेला जीआर काढून राज्य शासनाने राज्यातील बैलगाडा शर्यती संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात परवानगी देण्यात येणार आहे. 

राजकीय कार्यक्रम, वाढदिवस आदी प्रसंगी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात परवानगी कोणत्याही परिस्थितीमध्ये देऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच राज्यात केवळ बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी अशा प्रकारच्या 1000 मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या बैलगाडा शर्यतीस परवानगी आहे. राज्यातील अनधिकृतपणे आयोजित होणाऱ्या आरत पारत, बैल घोडा, लाकूड ओंडका ओढणे, चिखलगट्टा, समुद्रकिनाऱ्यावरील शर्यती, टक्कर तसेच एक हजार मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यतीला प्रतिबंध असणार आहे. बैलगाडा शर्यत आयोजित करताना नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यात विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन झाल्यास गुन्हा दाखल होणार आहे. शर्यतीच्या पंधरा दिवस अगोदर परवानगीसाठी अर्ज करावा लागेल. नियम व अटीचे पालन करूनच शर्यतीचे आयोजन करावे लागेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बैलगाडा  शर्यत कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे

बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश येऊन शर्यती सुरू झाल्या. मात्र पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या बैलगाडा शर्यतीपेक्षा वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या गेल्या.आता शासनाने त्यावर बंधने आणली आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्वांनी नियमाचे पालन करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करावे ही शर्यत कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे.- संदीप बोदगे, अखिल भारतीय बैलगाडा संघटना.

टॅग्स :PuneपुणेBull Cart Raceबैलगाडी शर्यतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारPoliticsराजकारण