शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला नाही तर क्रांतिकारकांच्या भीतीने इंग्रज पळाले- राज्यपाल कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 15:28 IST

राज्यपाल कोश्यारी यांनी सुरुवातीला गुरुकुलच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला

पिंपरी : महात्मा गांधीजींच्या (mahatma gandhi) सत्याग्रहाला नाहीतर जहाल क्रांतिकारकांचा उद्रेक होईल म्हणून इंग्रज भारतातून पळाले, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. प्राचीन भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्यानमाला आणि भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन या विषयावरील कार्यशाळा पुनरुत्थान समरसता गुरुकुलम चिंचवड येथे होत आहे. त्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी सुरुवातीला गुरुकुलच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी इंडियन कॉन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, गिरीश प्रभुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ॲड. सतिश गोरडे आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, चाफेकर बंधु यांच्या सारख्या क्रांतिकारकांच्या धाडस आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम पुनरुत्थान समरसता गुरूकुलम सारखे विद्यापीठांतून होत आहे. येथे तयार होणा-या कलाकृती या चांगल्या असून यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे महान कार्य सूरू आहे. त्याचा वटवृक्ष व्हावा. भटक्या विमुक्त लोकांच्या हाती कला आहे. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. या संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कलात्मक वस्तू आपण विकत घेऊन त्याला आर्थिक हातभार लावला पाहिजे,' असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले, 'पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कार्याचे व्यापक स्वरूप आहे. भटक्या विमुक्त लोकांना शिक्षण आणि विद्येच्या प्रवाहात आणण्याचे काम प्रभुणे करत आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे कौतुक होत आहे ही आनंदाची बाब आहे. मुख्यप्रवाह याचा अर्थ व्यापक करायला हवा, जेणेकरून भटके विमुक्त या धारेचा सहज भाग होऊन जातील. क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी पुढे घेऊन जाणारे गिरीश प्रभुणे यांचे काम वंदनीय आहे.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समितीच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सतिश गोरडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड