शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

पुणे-नाशिक महामार्गावर मृत्यूचा पूल, राजगुरुनगर ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:30 AM

पुण्याहून नाशिकला जात आहात, तर सावधान..! कारण, याच रस्त्यावरील राजगुरुनगरातील ओढ्यावरील पूल तुम्हाला थेट यमसदनी धाडू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूल रहदारीचे वजन पेलत असला, तरी त्याच्या साईडपट्ट्या मात्र जीर्ण होऊन केव्हाच ओढ्यावर लोंबकळत आहेत.

दावडी : पुण्याहून नाशिकला जात आहात, तर सावधान..! कारण, याच रस्त्यावरील राजगुरुनगरातील ओढ्यावरील पूल तुम्हाला थेट यमसदनी धाडू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूल रहदारीचे वजन पेलत असला, तरी त्याच्या साईडपट्ट्या मात्र जीर्ण होऊन केव्हाच ओढ्यावर लोंबकळत आहेत. त्यामुळे पुलाच्या डांबरीकरणावरून एखादा इंचही तुमची गाडी घसरली, तर ती थेट पंधरा-वीस फूट खोल ओढ्यात जाऊन पडणार आहे. त्यामुळे हा पूल म्हणजे जणू पुणे-नाशिक महामार्गावरून मृत्यूला जोडणाराच पूल झाला आहे.पुणे-नाशिक महामार्ग हा राजगुरुनगर शहरातून जातो. राजगुरुनगरात येताच एका ओढ्यावर ब्रिटिशकालीन पूल लागतो. तो पूल ओलांडण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात एक पूल बांधला होता. हा पूल सुरू होण्याआधी सुमारे शंभर मीटरवरून रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी रेलिंग लावण्यात आले होते. मात्र, कालांतराने या पुलाची व रेलिंगजी डागडुजी झालीच नाही.त्यामुळे काही किरकोळ अपघातांत साईडचे लोखंडी रेलिंग तुटले आणि ते घसरत-घसरत थेट ओढ्यावर लोंबकळत आहे. इतकेच नव्हे, तर पुलाजवळील रस्ता खचून गेल्याने वाहने एक इंच जरी रस्त्यावरून खाली आल्यास थेट ओढ्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याची डागडुजी करण्याऐवजी मातीचा भराव टाकला आहे; त्यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी घसरडा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती आहे.त्यामुळे हा पूल ओलांडताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. केवळ चारचाकीच नव्हे, तर दुचाकीस्वारांचा जीवही या धोकादायक पुलामुळे येथून जाणे अत्यंत कठीण झाले आहे.अनधिकृत पार्किंगमुळे रस्ता झाला अरुंदपूल सुरू होण्याआधी रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे; मात्र त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग केले जाते. या रस्त्यावर दुतर्फा विविध दुकानांची गर्दी असल्यामुळे दुकानात खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या कडेलाच वाहन पार्क करून दुकानात शॉपिंग करतात. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या पार्किंगमुळे पूल सुरू होण्याच्या आधीच रस्ता अरुंद होतो आणि वाहतुकीची कोंडी सुरू होते.पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाची जशी अवस्था आहे, तशीच अवस्था येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगतच्या पुलाची झाली आहे. त्यामुळे येथील पूल आणि साईडचे रेलिंग त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अशा आहेत त्रुटीइतक्या महत्त्वाच्या रस्त्यावर कुठेही दुभाजक नाही. रस्त्यावर कुठेही साईडला व मध्यभागी पांढरे पट्टे मारलेले नाहीत; त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या रुंदीचा आणि सेंटरपॉइंटचा अंदाज येत नाही.रात्रीच्या वेळी तर रस्त्याची रुंदी कुठे संपते, याचा किंचितही अंदाज येत नाही. पूल सुरू झाल्यावर त्याच्या कठड्यांना रिफ्लेक्टरही लाण्यात आले नाहीत; त्यामुळे या पुलावरून वाहन चालविणे म्हणजे एक दिव्यच मानले जाते.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेक वेळा येथे वाहतूक जाम होते. वाहनांच्या कधीकधी रांगा लागतात; त्यामुळे काही वाहनचालक गाडी पुढे नेण्याच्या नादात डांबरी रस्त्यावरून खाली उतरतात व पूल जवळ आल्यावर मात्र तेथे माती खचली असल्याने पुलाजवळ येऊन फसतात.येथे अनेक वेळा अपघात झाले. विशेषत: रात्रीच्या वेळी वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर तर नवख्या वाहनचालकांचा अपघात हा जणू ठरलेलाच आहे.

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिक