शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

Chandni Chauk: ७० टनाचे रणगाडे जातील इतका मजबूत होता चांदणी चौकातील पूल

By श्रीकिशन बलभीम काळे | Published: October 03, 2022 6:56 PM

आवश्यक तेवढेच स्टील वापरत बनवला होता चांदणी चाैकातील पूल

पुणे : चांदणी चौकातील पूल तयार करताना त्यावरून एनडीएचे ७० टनांचे रणगाडे जातील, इतका मजबूत करण्याचे आम्हाला सांगितले हाेते. त्यानुसार आम्ही तो पूल बनविला होता. त्यासाठी खूप स्टील वापरल्याचे बोलेले गेले; पण तसे काहीही केलेले नाही. पुलाला जेवढे स्टील आवश्यक असते, त्यानुसारच ते वापरले, असे स्पष्टीकरण चांदणी चौकातील पूल बांधणारे सिव्हिल इंजिनिअर व डिझायनर सतीश मराठे (वय-७६) यांनी सांगितले.

मोठा गाजावाजा होऊन चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. या पार्श्वभूमीवर हा पूल बांधणारे सतीश मराठे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ज्यांना हा पूल पाडायचा होता, त्यांना ते नीट जमले नाही, त्यामुळेच ते खोटं बोलत आहेत, असेही मराठे म्हणाले.

पुलाचे काम आमच्याच मार्फत

मी आणि माझे भागीदार मित्र अनंत लिमये आम्ही दोघांनी बरली इंजिनिअर्स नावाची कंपनी होती. त्या पुलाचे डिझाइन मीच केले होते. केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काम आमच्याच मार्फत केले होते. तेव्हा कुलकर्णी आणि देशपांडे नावाचे सरकारी इंजिनिअर होते. त्यांनीदेखील प्रामाणिकपणे काम केले. मी आणि अनंत लिमये दोघांनी १९८२ ते २००२ दरम्यान २५ पूल बांधले आहेत. त्यात पुणे विभागात अधिक आहेत. कोल्हापूर, सातारा, नाशिक, निफाड येथे पण बांधले आहेत. निफाड येथील शंभर मीटरचा पूल, तर शंभर दिवसांत बांधला.

सतीश मराठे म्हणाले...

- साधारण १९९२ साली आम्ही आळंदीचा पूल बांधला आहे. तेव्हा पुलावरून पाणी जाईल, हे आम्हाला सांगितले नव्हते; कारण तेव्हा पूररेषा खूप खाली होती. आता पुलावरून पाणी जातेय, तरी तो उभा आहे.

- मागे म्हात्रे पुलाजवळील रस्ता खचला होता; पण पूल पडला असे बोलले गेले. पूल आणि रस्ता यांच्यात जमीन-आस्मानचा फरक आहे.

आम्ही आमचा व्यवसाय बंद केला...

पीडब्लूडीकडील पैसे संपल्यानंतर त्यांनी पीपीपीअंतर्गत तुम्ही बांधा, पैसे खर्च करा आणि मग टोलद्वारे पैसे घ्या, अशी योजना जाहीर केली. तेव्हा एकदम ३०० ते ४०० कोटी रुपये जमा करणे शक्य नव्हते. मग आम्ही आमचा व्यवसाय २००२ पासून बंद केला.

आता पुलाचे आयुष्य निम्म्यावर !

मी १९७० मध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. तेव्हा आम्हाला एका पुलाचे आयुष्य १०० वर्षे असल्याचे सांगितले गेले. माझ्या मुलाने पदवी घेतली तेव्हा त्याला पुलाचे आयुष्य ५० वर्षांचे असते, असे सांगितले. कोणाला नफा किती जास्त हवा, त्यावर सर्व ठरतं. चांगलं काम करूनही नफा मिळतो. ज्यांना अधिक हवा असतो, ते मग चोरीचे काम करतात.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnda puneएनडीए पुणे