शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By राजू इनामदार | Updated: May 31, 2024 20:29 IST

पुण्याची सध्या होणारी बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत असून त्यावर हे गंभीर नाही

पुणे: पोर्शे अपघात प्रकरणात सरकारच्या वेगवेगळ्या खात्याकडून दररोज वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत. गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन गेले, त्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले. मग आता त्यांनीच राज्याला व देशाला नक्की काय ते सांगावे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अहिल्याबाई होळकर यांच्या सारसबाग येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सुळे शुक्रवारी दुपारी पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. पुण्यात देशपरदेशातून मुले शिक्षणासाठी येतात. पण, इथे ड्रग्ज कल्चर सुरू झाले आहे. अपघात होत आहेत. ससूनमधून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. पुण्याची ही बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत आहे. हे सरकार गंभीर नाही. घरे फोडा व पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच त्याचा उद्योग आहे असे सुळे म्हणाल्या.

हिंजवडी येथून आयटी उद्योग बाहेर जात आहेत, याकडे सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, हेही सरकारचेच अपयश आहे. शरद पवार यांनी जाणीपूर्वक हा आयटी उद्योग पुण्यात आणला. त्याचे एक स्वतंत्र मॉडेल तयार केले. आता ते सगळेच उद्ध्वस्त होत आहे, याचे कारण सरकारच गंभीर नाही. कांद्याचा निर्यात कर थांबवला ही फसवी घोषणा होती. आता कर्नाटकने ते केले, तर महाराष्ट्रात का नाही हे राज्य सरकारलाच विचारायला हवे.

ससून ही संस्था राज्यातील नव्हे, तर देशातील उत्कृष्ट संस्था आहे. तिथे मागील काही महिन्यात जे काही प्रकार घडले त्यात संस्थेचा नाही, तर तिथे राजकीय हस्तक्षेप होतो आहे, याचा दोष आहे. ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तिथे सापडल्यानंतर आता पोर्शे अपघातासंदर्भातही तिथेच घोटाळे होत आहेत. याचे कारण राजकीय हस्तक्षेप हेच आहे, असा थेट आरोप सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस ललित पाटील प्रकरणानंतरही पुण्यात आले होते व आता अपघातानंतरही आले. त्यांनीच कोणाला सोडणार नाही अशी घोषणा केली. मग आता राज्याला व देशाला या प्रकरणांमध्ये नक्की काय आहे ते सांगण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार