शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

रस्ता नसल्याने डिस्चार्ज मिळालेल्या आईसाठी डोली करून मुलगा ३० किलोमीटर अंतर चालला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:38 IST

दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर रस्ता नसल्याने आईला डोली करून नेण्याची वेळ...

राजेंद्र रणखांबे -

मार्गासनी : पुणे जिल्ह्यात अद्यापही काही गावे अशी आहे की, त्याठिकाणी रस्ते, वीज, पाणी या जीवनावश्यक सुविधा पोहचलेल्या नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी जीवतोड संघर्ष करावा लागतो आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. आईला आपल्या गावी घरी नेण्यासाठी मुलाने आणि एका नातेवाईकाने डोंगर कड्या कपारीतुन ३० किलोमीटरचे खडतर अंतर पार करत डोलीवरून घोल या गावात पोहचवले. अतिशय खडतर प्रवास लीलयापार केल्यामुळे गावात आल्यानंतर परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील चांदर हे गाव दऱ्या खोऱ्यांच्या मध्यभागी व दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी वसलेले आहे. स्वातंत्र्यानंतर अद्यापही या गावात कोणताही रस्ता झालेला नाही. त्यामुळे गावात दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही.गावातून एसटीसाठी जायचे झाल्यास डोंगर चढुन तीन तासांच्या प्रवासानंतर एसटीच्या थांब्यावर पोहचता येते. गावातील बारकाबाई लक्ष्मण सांगळे (वय ६०) ह्या आजारी पडल्या. पुणे शहराकडे येण्यासाठी तीन तास चालणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा बाळासाहेब लक्ष्मण सांगळे व दीर मारुती सांगळे यांनी तिला महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर आजीला घरी सोडले. त्यावेळी मुलगा व दीर यांनी रायगड किल्ल्याच्या डोंगर रांगामधुन तिला उन्हा-तान्हात पायपीट करत कधी थांबत तर कधी थोडीसी विश्रांती घेत डोलीमधुन आपल्या मूळ गावी चांदर येथे आणले.

सह्याद्रीच्या डोंगर रांगा या परिसरात असुन किल्ले रायगड,किल्ले लिंगाणा असे अवघड गड देखील याच भागात आहेत.उंच उंच भिंतीसारखे याठिकाणी मोठ मोठे कडे आहेत.केवळ वाऱ्याची झुळुकच या कडी कपारीतुन जाऊ शकते. प्राणी व मानव या अवघड वाटेतुन जाऊ शकत नाही.जाताना वाटेत खुप मोठे जंगल येते. या जंगलात रानटी जनावर देखील आहेत.बिबट्याचे,दर्शन या परिसरात ग्रामस्थांना नेहमीच घडत असते. तरीदेखील आजीच्या इच्छेसाठी मुलाने व दिराने या अवघड वाटेतुन तब्बल तीस किलोमीटर प्रवास करत डोलीमधुन आजीला गावी सुखरुप आणले. आधुनिक युगात मुले आईवडिलांना अनाथ आश्रमात पाठवतात.पण याच युगात अजुनदेखील श्रावणबाळ जिवंत आहे. जे आईने व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रचंड खडतर प्रवास करतात.

आजीला आपल्या गावी घरी नेण्यासाठी आजीच्या मुलाचा व दिरांचा डोंगर कड्या कपारीतुन जीवघेणा प्रवास करीत घोल या गावात पोहचवले. अतिशय खडतर प्रवास या दोघांनी यशस्वीरित्या पार केला. गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी मुलाचे व दिराचे कौतुक केले.

माझ्या आईची एकच इच्छा होती की, मला माझ्या गावात मरण आले पाहिजे.त्यासाठी तिला महाड येथुन डोंगर दऱ्यांमधून डोलीकरून मूळ गावी चांदर येथे आणले.- बाळासाहेब सांगळे, मुलगा. .... गावामध्ये दळणवळणाचे कोणतेही साधन नाही तसेच आरोग्यसेवेसाठी पुण्यापेक्षा महाडला जाण्यास आम्हाला सोयीस्कर आहे. डोंगर दऱ्यातील पायवाटेने महाडला जाता येते.बारकाबाईला दवाखान्यातुन सोडल्यानंतर तिच्या इच्छेप्रमाणे गावात आणले.- मारुती सांगळे, दीर     

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरhighwayमहामार्गState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार