शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 02:39 IST

भावात मोठी घसरण, सरासरी भाव ३ ते ७ रुपये किलो, चिंगळी कांदा एक रुपया किलो

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुना व नवीन अशा दोन्ही कांद्यांची आवक झाल्याने आवकेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत. घाऊक बाजारात कांद्याला सरासरी ३ रुपयांपासून ७ रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मागील वर्षी याच हंगामात जुन्या साठविलेल्या कांद्याला ३५ रुपये प्रतिकिलोस भाव होता, त्यामुळे याही वर्षी भाव वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठविला होता, पण भाव गडगडल्याने शेतकºयांची निराशा झाली असून, उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले असून कांदाउत्पादनासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. यामुळे शेतकºयांवर कांदे फुकट वाटण्याची वेळ आली आहे. चाकण बाजारात काल प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे; मात्र बाजार समिती कांद्याला कमीत कमी ३०० व जास्तीत जास्त १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे सांगत आहे.वखारीतील कांदा सडतोयअनेक शेतकºयांनी मागील वर्षी साठविलेला जुना कांदा चांगल्या हवामानामुळे टिकून राहिला असला, तरी आता तो सडण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी या हंगामात चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये समाधान होते; परंतु बाजारात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुन्या कांद्यावरील आवरण काळे पडू लागल्याने प्रतवारी करताना निम्म्याहून अधिक कांदे फेकून द्यावे लागत आहेत. जुन्या कांद्याला अतिशय कमी म्हणजे, अगदी १ रुपयापासून सहा रुपयांपर्यंत तर, नवीन कांद्याला ४ ते ७ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.हमीभाव देण्याची मागणीकांदा उत्पादन करताना मशागत, लागवड, खुरपणी, पाणी, खते, औषधे, फवारणी, काढणी, मजुरी, पॅकिंग, वाहतूक, वीजबिल असा एकरी ३५ ते ४५ हजार रुपये खर्च येतो व आजच्या बाजारभावानुसार कांद्याचे १५ ते २० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकºयाला एकरी २० ते २५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयाला खासगी सावकार, सोसायट्या, बँकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करता येत नाही. त्यामुळे सरकारने शेतकºयांना कृषी वीजबिले माफ करून शेतीसाठी मोफत वीज द्यावी, व शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.शेतकºयांकडे असणारा कांद्याचा जुना साठा व नवीन काढलेला कांदा एकाचवेळी बाजारात आल्याने आवक वाढली. त्याचा भावावर परिणाम झाला आहे. साठवलेला जुना कांदा संपला की कांद्याला चांगला भाव मिळू शकतो.- चंद्रकांत इंगवले, सभापती खेड बाजार समितीपाकिस्तान व अफगाणिस्तान मधून मोठ्या प्रमाणावर कांदा कर्नाटकमध्ये आयात झाला असून, कांद्याचा मोठा साठा झाला आहे. त्यातच कांद्याची निर्यात बंद असल्याने भाव गडगडले आहेत. शेतकºयांच्या हितासाठी कांदा निर्यात सुरू करावी.- तुकाराम बोत्रे, शेतकरी, खालुंब्रेनव्याने बाजारात येणारा पंचगंगा कांदा टिकत नसल्याने त्याची बाजारात आवक वाढली आहे. तुलनेने मागणी कमी व बाजारात कांद्याचा पुरवठा जास्त झाल्याने त्याचा बाजारभावावर परिणाम झाला आहे.- माणिक गोरे ( कांदा व्यापारी, आडतदार, चाकण मार्केट यार्ड )

टॅग्स :onionकांदाChakanचाकणFarmerशेतकरी