शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 02:39 IST

भावात मोठी घसरण, सरासरी भाव ३ ते ७ रुपये किलो, चिंगळी कांदा एक रुपया किलो

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुना व नवीन अशा दोन्ही कांद्यांची आवक झाल्याने आवकेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत. घाऊक बाजारात कांद्याला सरासरी ३ रुपयांपासून ७ रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मागील वर्षी याच हंगामात जुन्या साठविलेल्या कांद्याला ३५ रुपये प्रतिकिलोस भाव होता, त्यामुळे याही वर्षी भाव वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठविला होता, पण भाव गडगडल्याने शेतकºयांची निराशा झाली असून, उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले असून कांदाउत्पादनासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. यामुळे शेतकºयांवर कांदे फुकट वाटण्याची वेळ आली आहे. चाकण बाजारात काल प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे; मात्र बाजार समिती कांद्याला कमीत कमी ३०० व जास्तीत जास्त १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे सांगत आहे.वखारीतील कांदा सडतोयअनेक शेतकºयांनी मागील वर्षी साठविलेला जुना कांदा चांगल्या हवामानामुळे टिकून राहिला असला, तरी आता तो सडण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी या हंगामात चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये समाधान होते; परंतु बाजारात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुन्या कांद्यावरील आवरण काळे पडू लागल्याने प्रतवारी करताना निम्म्याहून अधिक कांदे फेकून द्यावे लागत आहेत. जुन्या कांद्याला अतिशय कमी म्हणजे, अगदी १ रुपयापासून सहा रुपयांपर्यंत तर, नवीन कांद्याला ४ ते ७ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.हमीभाव देण्याची मागणीकांदा उत्पादन करताना मशागत, लागवड, खुरपणी, पाणी, खते, औषधे, फवारणी, काढणी, मजुरी, पॅकिंग, वाहतूक, वीजबिल असा एकरी ३५ ते ४५ हजार रुपये खर्च येतो व आजच्या बाजारभावानुसार कांद्याचे १५ ते २० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकºयाला एकरी २० ते २५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयाला खासगी सावकार, सोसायट्या, बँकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करता येत नाही. त्यामुळे सरकारने शेतकºयांना कृषी वीजबिले माफ करून शेतीसाठी मोफत वीज द्यावी, व शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.शेतकºयांकडे असणारा कांद्याचा जुना साठा व नवीन काढलेला कांदा एकाचवेळी बाजारात आल्याने आवक वाढली. त्याचा भावावर परिणाम झाला आहे. साठवलेला जुना कांदा संपला की कांद्याला चांगला भाव मिळू शकतो.- चंद्रकांत इंगवले, सभापती खेड बाजार समितीपाकिस्तान व अफगाणिस्तान मधून मोठ्या प्रमाणावर कांदा कर्नाटकमध्ये आयात झाला असून, कांद्याचा मोठा साठा झाला आहे. त्यातच कांद्याची निर्यात बंद असल्याने भाव गडगडले आहेत. शेतकºयांच्या हितासाठी कांदा निर्यात सुरू करावी.- तुकाराम बोत्रे, शेतकरी, खालुंब्रेनव्याने बाजारात येणारा पंचगंगा कांदा टिकत नसल्याने त्याची बाजारात आवक वाढली आहे. तुलनेने मागणी कमी व बाजारात कांद्याचा पुरवठा जास्त झाल्याने त्याचा बाजारभावावर परिणाम झाला आहे.- माणिक गोरे ( कांदा व्यापारी, आडतदार, चाकण मार्केट यार्ड )

टॅग्स :onionकांदाChakanचाकणFarmerशेतकरी