शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

ब्लॅकमेलिंगने संसार उद्ध्वस्त : पत्नीच्यापाठोपाठ पतीचीही आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 02:41 IST

विवाहितेच्या आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा

पुणे : ब्लॅकमेलिंगला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्यावर तिच्याच घरच्यांच्या तक्रारीनंतरच्या ब्लॅकमेलिंगमुळे पतीनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आंबेगाव परिसरात घडली. सागर शिळीमकर (वय ३२) असे या तरुणाचे नाव आहे. पूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिराला अटक केली.

दरम्यान, विवाहितेच्या पालकांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याने तिच्या पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या जोडप्याने आंबेगाव येथील राजयोग सोसायटीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सागर शिळीमकर असे आत्महत्या करणाºयाचे नाव आहे. सागरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेचे आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की सागरची पत्नी गीतांजली व तिचा प्रियकर आयर्न राक्षे यांना सागरच्याच फ्लॅटमध्ये असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यावरून गीतांजलीने सागरशी भांडण करून २४ सप्टेंबरला आत्महत्या केली होती. त्यानंतर गीतांजलीची आई जयश्री पवार यांनी सागरचा दीर सुहास शिळीमकर याला तिच्या मृत्यूस जबाबदार ठरवले. शिवाय, गीतांजलीचे प्रेमसंबंध सर्वांना सांगेल, अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असा आरोपही त्यांनी केला होता़

यापूर्वीही गीतांजलीचे काका लक्ष्मण बर्डे यांनी असेच आरोप करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याचा आरोप शिळीमकर कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत जयश्री पवार यांनी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने त्रासलेल्या सागरने जेथे गीतांजलीने आत्महत्या केली होती, त्याच घरात २९ सप्टेंबरला गळफास घेतला.दरम्यान, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी लक्ष्मण बर्डे आणि आर्यन राक्षे यांना अटककेली आहे़ पोलीस उपनिरीक्षक खानविलकर अधिक तपासकरीत आहेत.गीतांजली व सागर यांचा डिसेंबर २०१३ मध्ये विवाह झाला होता़ लग्नानंतर दोनच महिन्यांनी तिचा दीर सुहास याला गीतांजलीचे लग्नापूर्वी चाकणमधील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. ती पतीबरोबर आंबेगाव खुर्द येथे राहत होती, तर तिचा दीर सुहास भोर तालुक्यातील वीरवाडी येथे राहतो. तो जाणीवपूर्वक पुण्यात येऊन गीतांजलीला लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना सांगेन, अशी धमकी देत होता. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत असे, या धमक्यांना कंटाळून गीतांजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, अशी तक्रार तिची आई जयश्री पवार यांनी दिली होती़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी