शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:18 IST

महाराष्ट्र आणि देशात सुडाचे गलिच्छ राजकारण सुरू असून भाजपकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही

बारामती : बारामतीत शेतीमालाला हमीभाव, दुष्काळ, चाराछावणी, टँकर, बेरोजगारीसारखे अनेक महत्वाचे विषय आहेत. मात्र, या विषयांऐवजी केवळ शरद पवार यांना हरविणे हे एकच ‘टार्गेट’ भाजपने ठेवले आहे. हे दुर्दैव आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. ज्या पद्धतीने त्यांनी संपवून टाकण्याची भाषा वापरली. ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

बारामती येथे रविवारी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा पराभव आमच्यासाठी जास्त वजनदार आहे, असे वक्तव्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सुळे यांनी हा टोला लगावला. त्या सोमवारी (दि. १८) बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सुळे म्हणाल्या, काल भाजपच्या मनातील ओठात आले. महाराष्ट्र आणि देशात सुडाचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही, हे काल सिद्ध झाल्याचे सुळे म्हणाल्या.

इंदापूर येथील गोळीबाराच्या घटनेवर देखील सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, बंदूक म्हणजे खेळणे झाले आहे. प्रत्येक नागरिकांची सुरक्षितता ही गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. गाेळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्यात ट्रीपल इंजिन सरकार आल्यापासून ‘क्राइम रेट’ वाढला आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’, हा प्रश्न मनात येतो, असे सुळे म्हणाल्या. इलेक्ट्रोबाँड हा देशातील मोठा भ्रष्टाचार आहे, असा विचार सर्वांच्या मनात येत आहे. याबाबत तातडीने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे.

त्यांनी सर्वांसमोर मन मोकळे केले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी रविवारी (दि. १७) रात्री काटेवाडी येथे बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मला तसे वाटत नाही, असे मत व्यक्त केले. काटेवाडी हे ‘श्रीनिवासदादां’चे गाव आहे. ते त्यांच्या मित्रांसमोर बोलत होते. त्यांनी सर्वांसमोर मन मोकळे केले. श्रीनिवासदादा आणि शर्मिलावहिनी माझा प्रत्येक निवडणुकीत प्रचार करतात, असे खासदार सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणBJPभाजपाlok sabhaलोकसभा