शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 17:16 IST

भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता

पुणे : भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून महाराष्ट्राची बदनामी करुन घेतली आणि कोश्यारींनी संपूर्ण कार्यकाळात पक्षपातीपणा केला. कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली आहेत त्याची फळे भाजपला भोगावीच लागतील अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पुण्यात ते बोलत होते. राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सगळ्या विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत त्यात नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल कसे असू नयेत याचे उत्तम उदाहरण आहेत. राजभवनात बसून त्यांनी केलेले राजकारण राज्यातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता. स्वत:ला महाशक्ती समजणारं नरेंद्र मोदींचं सरकार यांनी महापुरुषांना बदनाम करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा विरोध महाराष्ट्राच्या जनतेने केला त्याचप्रमाणे आता भाजपला खाली उतरवायचं असेल आणि महागाई कमी करायची असेल तर भाजपला सत्तेतून काढावं लागणार आहे, अशी भावना जनतेच्या मनात रुजवणं गरजेचं असल्याचं नाना पटोले यांनी सांगितले. 

राजीनामा स्वीकारायला फार उशीर झाला- सुप्रिया सुळे

भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यासाठी फार उशीर केला आहे. त्यांना कधीच या पदावरुन हटवण्यात यायला हवं होतं. राज्यपालांनी नेहमी महापुरुषांचा अपमान केला. त्यामुळे त्यांना या पदावरुन फार पूर्वीच हटवण्यात यायला हवं होतं. भाजप सरकारकडून अनेक दिवसांनी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा रोष आणि विरोधीपक्षाने मांडलेली भूमिकेमुळे भाजपला राजीनामा मंजूर करावा लागला. कोश्यारींना आम्ही कायम मान दिला. राज्यपाल पदावर बसणाऱ्या माणसाने संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं.मात्र त्यांनी त्या उलट केलं. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान सातत्याने केला. त्यामुळे भाजपच्या निर्णयाचं स्वागत आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा