शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पुण्यातल्या आठही जागा भाजप लढवणार : माधुरी मिसाळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 09:25 IST

भाजपची महाजनादेश यात्रा पुणे शहराचा टप्पा ओलांडून गेल्यावर शहर संघटनेत चांगलाच आत्मविश्वास जागृत झाला असून शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी विधानसभेच्या सर्व म्हणजेच आठही जागा भाजपच लढवणार असल्याचे विधान केले आहे.

पुणे : भाजपची महाजनादेश यात्रा पुणे शहराचा टप्पा ओलांडून गेल्यावर शहर संघटनेत चांगलाच आत्मविश्वास जागृत झाला असून शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी विधानसभेच्या सर्व म्हणजेच आठही जागा भाजपच लढवणार असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपमधील इच्छुक खुश असले तर शिवसेनेत मात्र अस्वस्थता वाढली आहे. 

२०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात लढवल्या होत्या. त्यावेळी आलेल्या निकालात शहरातील सर्व मतदारसंघात भाजपला कौल मिळून आठही ठिकाणी कमळ उमलले होते. त्यामुळे आता विद्यमान आमदार असलेल्या जागा सोडणार नाही असा पवित्रा स्थानिक नेत्यांनी घेतला आहे तर २००९प्रमाणे जागावाटप व्हावे अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यामुळे आता पुण्याच्या जागांवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

याबाबत मिसाळ म्हणाल्या की, 'आम्ही आठही विधानसभा लढवणार आहोत,कारण सर्व ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत. भाजपने निवडणूक लढवण्याकरिता लागणारी तयारी सुरु केली असूनसंयोजक, प्रभारी यांच्या नेमणुका झाल्या आहेत. येणाऱ्या काळात लागणारे दौरे, सभा यांची तयारी पूर्ण झाली असून त्या नियोजनकरिता वॉर रूम सज्ज आहे. बूथ उभारणीही झाली असून आम्ही  आठही मतदारसंघ लढण्यासज्ज आहोत. दुसरीकडे शिवसेनेचे महापालिका गटनेते संजय भोसले यांनी मात्र लोकसभेच्या निकालांमुळे भाजप हवेत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 'भाजपने लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांचे काम करून घेतले. आता सन्मानाने युती होणे गरजेचे आहे. आठ काय आमची २८८ जागांवर लढण्याची तयारी असून पक्षप्रमुख घेतील तो निर्णय मान्य राहील. मात्र पुण्यातले सेनेचे तीन जुने मतदारसंघ परत मिळायला हवेत'. 

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात असताना पुण्यात मात्र जागांवरून संघर्ष उभा राहू शकतो. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या मनाप्रमाणे जागांचे वाटप होणार की वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे स्थानिकांना लढावे लागणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Madhuri Misalमाधुरी मिसाळShiv SenaशिवसेनाBJPभाजपा