शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

भाजपला ताब्यात घ्यायच्या आहेत बाजार समित्या, प्रवीणकुमार नाहटा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:40 IST

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी मतदानाचा अधिकार दिल्यास, खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. खर्च परवडणारा नाही. समित्या ...

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी मतदानाचा अधिकार दिल्यास, खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. खर्च परवडणारा नाही. समित्या आधीच तोट्यात असून, अधिक तोट्यात जातील. यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच व्हाव्यात. भाजपला बाजार समित्या ताब्यात घ्यायच्या आहेत, त्यासाठी असा निर्णय घेतला आहे, असा आरोप राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीणकुमार नाहटा यांनी केला आहे.

नाहाटा यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप केला. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी उपस्थित होते. नाहाटा म्हणाले, ‘‘फडणवीस मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयातून भाजपला राज्यातील बाजार समित्यांवर वर्चस्व मिळवायचे आहे. शेतकरी मतदान प्रक्रियेतून करमाळा आणि सोलापूर बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांना अनुक्रमे ७० लाख आणि १ कोटी २० लाख रुपये खर्च झाला होता. बाजार समित्यांचे उत्पन्नच एक दोन कोटी रुपये असते. तो सर्वच खर्च निवडणुकांवर होत असेल, तर बाजार समित्या चालवायच्या कशा, असा प्रश्न आहे. या माध्यमातून भाजपला बाजार समित्या संपवायच्या आहेत.”

याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सांगितले असता, त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले आणि या प्रश्नी काहीही बोलले नाहीत, तर याबाबत लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे, तसेच पावसाळी अधिवेशनात या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार आहे. वेळप्रसंगी न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा नाहटा यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी