शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भाजपला ताब्यात घ्यायच्या आहेत बाजार समित्या, प्रवीणकुमार नाहटा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:40 IST

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी मतदानाचा अधिकार दिल्यास, खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. खर्च परवडणारा नाही. समित्या ...

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी मतदानाचा अधिकार दिल्यास, खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. खर्च परवडणारा नाही. समित्या आधीच तोट्यात असून, अधिक तोट्यात जातील. यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच व्हाव्यात. भाजपला बाजार समित्या ताब्यात घ्यायच्या आहेत, त्यासाठी असा निर्णय घेतला आहे, असा आरोप राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीणकुमार नाहटा यांनी केला आहे.

नाहाटा यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप केला. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी उपस्थित होते. नाहाटा म्हणाले, ‘‘फडणवीस मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयातून भाजपला राज्यातील बाजार समित्यांवर वर्चस्व मिळवायचे आहे. शेतकरी मतदान प्रक्रियेतून करमाळा आणि सोलापूर बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांना अनुक्रमे ७० लाख आणि १ कोटी २० लाख रुपये खर्च झाला होता. बाजार समित्यांचे उत्पन्नच एक दोन कोटी रुपये असते. तो सर्वच खर्च निवडणुकांवर होत असेल, तर बाजार समित्या चालवायच्या कशा, असा प्रश्न आहे. या माध्यमातून भाजपला बाजार समित्या संपवायच्या आहेत.”

याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सांगितले असता, त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले आणि या प्रश्नी काहीही बोलले नाहीत, तर याबाबत लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे, तसेच पावसाळी अधिवेशनात या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार आहे. वेळप्रसंगी न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा नाहटा यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी