शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

Sharad Pawar: घटनेत बदल करण्यासाठीच भाजपला ४०० खासदार निवडून आणायचे होते; शरद पवारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:42 IST

महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून देऊन मोंदींना महाराष्ट्र काय ‘चीज’ आहे, ते दाखवून दिल्याचे शरद पवारांनी सांगितले

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ४०० खासदार निवडुन देण्याची भूमिका मांडत होते. देश चालवण्यासाठी २५० ते ३०० खासदार पूरेसे असतात. मात्र, त्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले संविधान हटवायचे होते. घटनेत बदल करण्यासाठीच त्यांना एवढे खासदार निवडून आणायचे होते, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. मात्र, महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून देऊन मोंदींना महाराष्ट्र काय ‘चीज’ आहे, ते दाखवून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. बारामती येथे महायुतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.

सत्ताधाऱ्यांनी आज राज्यात महिला मुलींसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली. पण त्या  सुरक्षित नाहीत, आज तरुणांना शिक्षण घेऊन देखील तरुणांना रोजगार नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली. मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात, अशा शब्दात पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिला, मुलींचा जरुर सन्मान करा, पण आज राज्यात या बहिणींची काय अवस्था आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. या अत्याचारीत मुली आणि महिलांची संख्या ६७ हजार ३८१ वर पोहचली आहे. ६४ हजार मुली बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणती पावले टाकली, याचे उत्तर द्यावे,अशी टीका पवार यांनी केली.

राज्यात शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाची निर्यातबंदी केली. २० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांचा काय गुन्हा होता, शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. देशातील उद्योजकांचे १६ हजार कोटींची केंद्र सरकारने कर्जमाफी केली. मात्र, शेतकऱ्यांवर कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याची वेळ आल्याची टीका पवार यांनी केली. आज राज्यात मुले मुलींनी शिक्षण घेतले. पण त्यांना नोकऱ्या नसल्याने ते निराश आहेत. या निराशेतून मुले टोकाचे पाऊल उचलण्याची भीती यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामतीकरांमुळे मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी सुरु करुन मोठे उद्योग आणले. हजारो हातांना काम दिले. मात्र, आज सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते केवळ गुजरातचे नाहीत. देशाचा विचार न करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची का, याचा विचार करा, असा टोला पवार यांनी लगावला.

बारामती येथील सांगता सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी घेतलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘जिकडे म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय, अशा आशयाचा तो फलक होता. याशिवाय ‘कराल काय नाद परत, बापमाणुस अशा शरद पवार यांचे वर्णन करणाऱ्या फलकांनी सभेत अनेकांचे लक्ष वेधले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारyugendra pawarयुगेंद्र पवारbaramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा