शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भाजपाने जुने दिवस विसरू नयेत; युतीसाठी पुण्यात हिंदू संघटनांची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 14:44 IST

हिंदू महासभा, श्री शिव प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन या आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी एकत्र आले होते.

पुणे : सरकार फक्त हिंदू विचार, हिंदू हिताचे व्हावे, त्यासाठी भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवे. भाजपने जुने दिवस विसरू नयेत, असा इशारा देतानाच, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सरकार स्थापन केल्यास त्यांनी गंभीर परिणाम भोगायला तयार व्हावे, असा इशारा पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. समाजकार्य करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना राजकीय भूमिका स्पष्ट करत रस्त्यावर उतरतील, अशी परखड भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

हिंदू महासभा, श्री शिव प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन या आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी एकत्र आले होते. या पत्रकार परिषदेला मिलिंद एकबोटे, समीर कुळकर्णी, सुनील घनवट, श्याम महाराज राठोड, अनिल पवार उपस्थित होते.

यावेळी एकबोटे म्हणाले की, 'सरकार वारीला संरक्षण देऊ शकत नाही याचे प्रत्यंतर आले आहे. हा देश चैतन्यशील राहिला पाहिजे, ही जबाबदारी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण ही जबाबदारी विसरुन इथले राजकारणी मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत, यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. भाजप-शिवसेनेला जनादेश असतानासुद्धा सरकार स्थापन होत नाहीये.

समीर कुलकर्णी म्हणाले की, मतदारांना कोणत्याही राजकीय पक्षाने गृहीत धरू नये. अन्यथा जनता त्यांचे उत्तर मतदानातून देईल. यापुढे या दोन्ही पक्षांचा एकही आमदार निवडून येणार नाही यासाठी सर्व संघटना मिळून प्रचार करतील. आघाडीबरोबर सरकार स्थापन करून शिवसेना धोक्याच्या घंटेला आमंत्रण देत आहे. आम्ही वैचारिक विरोधासाठी सरसावू.

यावेळी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • महाराष्ट्रात नवे जेएनयु होऊ नये आणि येथील विद्यार्थी लाल माकडांच्या नादी लागू नये.
  • महाआघाडी हे संकट आहे. हा आमचा विश्वासघात आहे.
  • लोकांच्या भावनांशी खेळत आहे.
  • ही महाशिवआघाडी होऊ देणार नाही. ती महाधूर्तआघाडी आहे.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hindutvaहिंदुत्व