शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारला आगामी काळात राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे लागणार : अन्वर राजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 16:33 IST

खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो.

ठळक मुद्देदेशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे

पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे सरकार स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आले आहे. या निवडणुकीत भाजपाने राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नावंर जनतेची मते मिळविण्यात यश मिळाले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला हे मुद्दे वापरुन मते मागता येणार नाही.त्यामुळे भाजपसमोर या प्रश्नांचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत असलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन.. ह्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाने विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचीही संधी ठेवलेली नाही, ही घातक अवस्था आहे. खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो. कारण गेल्या ५ वर्षांच्या काळात आणीबाणीसदृश परिस्थितीच होती. अनेक लेखक, कलाकार दडपणाखाली वावरत होते, प्रसारमाध्यमांवर निर्बंध येत होते. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केले. या वेळी भाजपच्या सर्व विरोधकांना एकत्र आणणे नीटपणे न झाल्याने ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आणीबाणीच्या काळात लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, या वेळी मोदींच्या विरोधात असलेल्या मतदारांना एकत्र करता आले नाही. देशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दंगलीमुक्त देश असणे आवश्यक आहे. गोरक्षकांकडून होणारे हिंसाचार थांबले पाहिजेत.    सध्या राजकीय पक्षांमध्ये असलेली ‘विचारशून्यता’ हा खूप मोठा धोका वाटतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपच्या वळचणीला जातो. इतरही काही पक्षांतर झाले. या पक्षातून त्या पक्षात जाणे अगदी सहज घडते, इथं कुठेही वैचारिक बैठक आड येत नाही. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेस