शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

भाजपा सरकारला आगामी काळात राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे लागणार : अन्वर राजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 16:33 IST

खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो.

ठळक मुद्देदेशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे

पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे सरकार स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आले आहे. या निवडणुकीत भाजपाने राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नावंर जनतेची मते मिळविण्यात यश मिळाले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला हे मुद्दे वापरुन मते मागता येणार नाही.त्यामुळे भाजपसमोर या प्रश्नांचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत असलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन.. ह्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाने विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचीही संधी ठेवलेली नाही, ही घातक अवस्था आहे. खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो. कारण गेल्या ५ वर्षांच्या काळात आणीबाणीसदृश परिस्थितीच होती. अनेक लेखक, कलाकार दडपणाखाली वावरत होते, प्रसारमाध्यमांवर निर्बंध येत होते. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केले. या वेळी भाजपच्या सर्व विरोधकांना एकत्र आणणे नीटपणे न झाल्याने ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आणीबाणीच्या काळात लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, या वेळी मोदींच्या विरोधात असलेल्या मतदारांना एकत्र करता आले नाही. देशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दंगलीमुक्त देश असणे आवश्यक आहे. गोरक्षकांकडून होणारे हिंसाचार थांबले पाहिजेत.    सध्या राजकीय पक्षांमध्ये असलेली ‘विचारशून्यता’ हा खूप मोठा धोका वाटतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपच्या वळचणीला जातो. इतरही काही पक्षांतर झाले. या पक्षातून त्या पक्षात जाणे अगदी सहज घडते, इथं कुठेही वैचारिक बैठक आड येत नाही. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेस