शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भाजपा सरकार रोजगार निर्मितीत अपयशी: राष्ट्रवादी काँग्रेस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:10 IST

दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. 

ठळक मुद्देलाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा मुद्रा योजनेत घोटाळा झाला असून कृषीक्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष आंदोलनानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन

पुणे : नोटाबंदीमुळे दोन वर्षात सव्वा कोटी लोकांचा रोजगार गेला असून नवे रोजगार तयार करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दोन कोटी रोजगार देऊ अशी घोषणा करुन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकायला सुरुवात केली आहे. दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदीचे ढोल पिटले गेले असले तरी खऱ्या अर्थाने उद्योग-सेवा क्षेत्राचे नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने  जवाब दो-जॉब दो आंदोलन घेण्यात आले. लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवकांना रोजगार उपलब्ध करुन द्या, मोदी सरकार जवाब दो अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे , माजी आमदार अशोक पवार, बापुसाहेब पठारे, सुरेश घुले, सुभाष जगताप, रवींद्र माळवदकर, जालिंदर कामठे, विशाल तांबे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे,  युवक अध्यक्ष राकेश कामठे ,युवती अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतातील बेरोजगारीचा दर 52 टक्के झाला असून महाराष्ट्राचा दर 48 टक्के आहे. 2017 मध्ये 15 लाख नोकऱ्या गेल्याचं आरबीआयचा अहवाल सांगतो. राज्यात बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढू लागली आहे. पुण्यातही गुन्हेगारीने कळस गाठला आहे. वैफल्यग्रस्त तरुणांना धर्माचा डोस पाजून त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्याकरिता होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या, तर गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली असती. केवळ पोकळ आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे तुपे यावेळी म्हणाले. मुद्रा योजनेत घोटाळा झाला असून कृषीक्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. मनरेगामध्ये रोजगार नाही, निधीअभावी रोजगार हमीची कामं ठप्प झाली आहेत. जीएसटीमुळे देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मोठ्या उद्योगपतींचा वेताळ पाठंगुळी घेऊन लघु उद्योजकांच्या शिराची सरकारने शंभर शकले केल्याची टीका करण्यात आली. तरुणाईला धार्मिक मुद्दे नकोत, तर नोकऱ्या पाहिजेत असे मत तरुणांनी यावेळी व्यक्त केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNavalkishor Ramनवलकिशोर राम