शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 05:02 IST

युतीबाबत आशावादी

पुणे : भारतीय जनता पक्ष व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत़ शिवसेनेसाठी आमची दारे सदैव खुली आहेत. तीस वर्षांची आमची मैत्री असून, दोघांचे रक्त व हिंदुत्व समान आहे़ हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील. पण दोन्ही पक्षांचे सरकार होईल की नाही हे मला माहित नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना पाटील हे पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, भाजप शिवसेनेने एकत्र सरकार स्थापन करून ते चालवायला पाहिजे होते. कारण जनादेश हा दोन्ही पक्षांना दिला होता़ भविष्यात या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत मी आशावादी आहे़ सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचे चर्चेसाठी त्यावेळीही दरवाजे खुले होते़ केवळ दरवाजेच कशाला पण आम्हाला अहंकार नसल्याने आमचा पुढाकाराही होता मात्र ते आले नाहीत. आजही आम्ही चर्चेसाठी त्यांचे स्वागतच करीत आहोत.

खडसे-मुंडे नाराज नाहीत

पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांच्या नाराजीविषयी बोलताना़, पाटील म्हणाले, हे दोघे पक्ष सोडून जाणार ही सध्या बातम्या नसल्याने माध्यमांनी केलेली स्टोरी आहे. पंकजा मुंडे यांना कळत नव्हते त्यावेळपासून त्या पक्षाशी जोडल्या गेलेल्या आहेत़ राजकारणाचे बाळकडू त्यांना घरूनच मिळाले आहे़ प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी उद्याच्या मेळाव्याला जाणार आहे.

खडसे यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यात पक्ष वाढविला आहे़ त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असे ते करणार नाहीत़ असा विश्वास व्यक्त करीत पाटील यांनी, केवळ त्यांचे काही म्हणणे आहे व पक्षाने ते ऐकून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले़

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे