शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 05:02 IST

युतीबाबत आशावादी

पुणे : भारतीय जनता पक्ष व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत़ शिवसेनेसाठी आमची दारे सदैव खुली आहेत. तीस वर्षांची आमची मैत्री असून, दोघांचे रक्त व हिंदुत्व समान आहे़ हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील. पण दोन्ही पक्षांचे सरकार होईल की नाही हे मला माहित नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना पाटील हे पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, भाजप शिवसेनेने एकत्र सरकार स्थापन करून ते चालवायला पाहिजे होते. कारण जनादेश हा दोन्ही पक्षांना दिला होता़ भविष्यात या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत मी आशावादी आहे़ सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचे चर्चेसाठी त्यावेळीही दरवाजे खुले होते़ केवळ दरवाजेच कशाला पण आम्हाला अहंकार नसल्याने आमचा पुढाकाराही होता मात्र ते आले नाहीत. आजही आम्ही चर्चेसाठी त्यांचे स्वागतच करीत आहोत.

खडसे-मुंडे नाराज नाहीत

पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांच्या नाराजीविषयी बोलताना़, पाटील म्हणाले, हे दोघे पक्ष सोडून जाणार ही सध्या बातम्या नसल्याने माध्यमांनी केलेली स्टोरी आहे. पंकजा मुंडे यांना कळत नव्हते त्यावेळपासून त्या पक्षाशी जोडल्या गेलेल्या आहेत़ राजकारणाचे बाळकडू त्यांना घरूनच मिळाले आहे़ प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी उद्याच्या मेळाव्याला जाणार आहे.

खडसे यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यात पक्ष वाढविला आहे़ त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असे ते करणार नाहीत़ असा विश्वास व्यक्त करीत पाटील यांनी, केवळ त्यांचे काही म्हणणे आहे व पक्षाने ते ऐकून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले़

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे