शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

भाटघर, नीरा देवघर १०० टक्के, वीरमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:32 IST

नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

नीरा : नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. भाटघर धरणामधून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मंगळवारपर्यंत वीर धरण १00 टक्के भरले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने वेळेत हजेरी लावली होती. मात्र, महिन्यापासून सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. भाटघर, नीरादेवघर, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने ही धरणे भरली आहेत. भाटघर धरणाची क्षमता २३.७५० टीएमसी असुन हे धरण शंभर टक्के भरले. या धरणामधून ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आजवर ४९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. निरादेवघर धरणाची क्षमता ११.९१ टीएमसी असून पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून ३००० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. तर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १५९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.वीर धरणाची क्षमता ९.८१५ टीएमसी असून आज अखेर शंभर टक्के पाणीसाठा या धरणात झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही धरणे भरली असल्याने पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्हयातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर राहिल्याने तसेच पाणलोट क्षेत्रात विसर्ग सुरू राहिल्याने वीर धरणामधून देखील नीरा नदीमध्ये संध्याकाळी साडेसह वाजण्याच्या सुमारास ४६३७ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.ब्रिटिशकालीन असलेल्या भाटघर धरणाला एकूण ८१ दरवाजे असून यापैकी ४५ दरवाजे हे स्वयंचलित आहेत. सध्या धरण्याच्या १७ स्वयंचलित धरणामधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर वीर धरणाच्या एक दरवाजा चार फुटांनी उचलण्यातआला आहे.पावसाने दिलेली साथ आणि ंंभाटघर धरणामधून सुरु असलेला विसर्ग यामुळे शेतकरी आनंदला आहे. नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतक-यांना आता शेतीचे नियोजन करता येणार आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस असाच सुरु राहीला तर शेतक-यांना त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणnewsबातम्या