शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भाटघर, नीरा देवघर १०० टक्के, वीरमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:32 IST

नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

नीरा : नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. भाटघर धरणामधून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मंगळवारपर्यंत वीर धरण १00 टक्के भरले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने वेळेत हजेरी लावली होती. मात्र, महिन्यापासून सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. भाटघर, नीरादेवघर, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने ही धरणे भरली आहेत. भाटघर धरणाची क्षमता २३.७५० टीएमसी असुन हे धरण शंभर टक्के भरले. या धरणामधून ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आजवर ४९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. निरादेवघर धरणाची क्षमता ११.९१ टीएमसी असून पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून ३००० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. तर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १५९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.वीर धरणाची क्षमता ९.८१५ टीएमसी असून आज अखेर शंभर टक्के पाणीसाठा या धरणात झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही धरणे भरली असल्याने पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्हयातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर राहिल्याने तसेच पाणलोट क्षेत्रात विसर्ग सुरू राहिल्याने वीर धरणामधून देखील नीरा नदीमध्ये संध्याकाळी साडेसह वाजण्याच्या सुमारास ४६३७ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.ब्रिटिशकालीन असलेल्या भाटघर धरणाला एकूण ८१ दरवाजे असून यापैकी ४५ दरवाजे हे स्वयंचलित आहेत. सध्या धरण्याच्या १७ स्वयंचलित धरणामधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर वीर धरणाच्या एक दरवाजा चार फुटांनी उचलण्यातआला आहे.पावसाने दिलेली साथ आणि ंंभाटघर धरणामधून सुरु असलेला विसर्ग यामुळे शेतकरी आनंदला आहे. नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतक-यांना आता शेतीचे नियोजन करता येणार आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस असाच सुरु राहीला तर शेतक-यांना त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणnewsबातम्या