शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भाटघर, नीरा देवघर १०० टक्के, वीरमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:32 IST

नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

नीरा : नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. भाटघर धरणामधून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मंगळवारपर्यंत वीर धरण १00 टक्के भरले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने वेळेत हजेरी लावली होती. मात्र, महिन्यापासून सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. भाटघर, नीरादेवघर, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने ही धरणे भरली आहेत. भाटघर धरणाची क्षमता २३.७५० टीएमसी असुन हे धरण शंभर टक्के भरले. या धरणामधून ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आजवर ४९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. निरादेवघर धरणाची क्षमता ११.९१ टीएमसी असून पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून ३००० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. तर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १५९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.वीर धरणाची क्षमता ९.८१५ टीएमसी असून आज अखेर शंभर टक्के पाणीसाठा या धरणात झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही धरणे भरली असल्याने पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्हयातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर राहिल्याने तसेच पाणलोट क्षेत्रात विसर्ग सुरू राहिल्याने वीर धरणामधून देखील नीरा नदीमध्ये संध्याकाळी साडेसह वाजण्याच्या सुमारास ४६३७ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.ब्रिटिशकालीन असलेल्या भाटघर धरणाला एकूण ८१ दरवाजे असून यापैकी ४५ दरवाजे हे स्वयंचलित आहेत. सध्या धरण्याच्या १७ स्वयंचलित धरणामधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर वीर धरणाच्या एक दरवाजा चार फुटांनी उचलण्यातआला आहे.पावसाने दिलेली साथ आणि ंंभाटघर धरणामधून सुरु असलेला विसर्ग यामुळे शेतकरी आनंदला आहे. नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतक-यांना आता शेतीचे नियोजन करता येणार आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस असाच सुरु राहीला तर शेतक-यांना त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणnewsबातम्या