शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे ‘भारतरत्न’चा सन्मान होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:58 IST

भाजप सरकारने संकल्पपत्रामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले

ठळक मुद्दे ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर नव्या पिढीला समजण्याची नितांत गरज भाजप सरकारने संकल्पपत्रामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व, राष्ट्रभक्ती वादातीत

पुणे : महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा संकल्प अभिनंदनास्पद आहे. सावरकरांना भारतरत्न जाहीर झाल्यास तो ‘भारतरत्न’ या सन्मानाचा गौरव असेल, असे मत सावरकरप्रेमींकडून व्यक्त होत आहे. तर, संकल्पपत्रात या  पुरस्काराबद्दलचा मुद्दा समाविष्ट करून भाजप मतांचे राजकारण करीत आहे, असाही मतप्रवाह व्यक्त होत आहे.ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर नव्या पिढीला समजण्याची नितांत गरज आहे. सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारक, महापुरुषाला आजवर काँग्रेस सरकारने बदनाम, कलंकित केले. सावरकर हे बुद्धिवादाचे प्रमाण आहे. त्यांचे राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा वादातीत आहे. आजवर सावरकरांवर अन्यायच झाला आहे.’’

अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व, राष्ट्रभक्ती वादातीत आहे. त्यांचा सन्मान झाल्यास तो ‘भारतरत्न’ या किताबाचाच सन्मान होईल. त्यामुळे संकल्पपत्रातून आश्वासन दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. मात्र, २०१४पासून केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. या कालावधीत अनेकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. एवढ्या वर्षांत सावरकरांच्या नावाचा विसर पडला का? आम्हाला निवडून दिले तर भारतरत्न देऊ, असे का म्हणायचे? भाजपा आश्वासनातून मतपेट्यांचे राजकारण करू पाहत आहे.’’अभिनेते योगेश सोमण म्हणाले, ‘‘संकल्पपत्रात या विषयाचा अंतर्भाव अभिनंदनीय आहे. भाजपा जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलते. त्यामुळे राज्य सरकारकडून सावरकरांच्या नावाची भारतरत्नसाठी नक्कीच शिफारस केली जाईल.’’.........स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार स्वीकारले असते, तर भारताने आज किती तरी पटींनी अधिक प्रगती केली असती. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष झाले आणि आजही होत आहे. आपण त्यांना एका विशिष्ट चौैकटीत बंदिस्त केले व ते आजवर उपेक्षितच राहिले. कोणताही सन्मान मिळावा म्हणून सावरकरांनी कधीच विचार केला नाही. भारतरत्न देऊन आपण किमान ही उपेक्षा कमी करू शकू. भाजप सरकारने संकल्पपत्रामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले, ही सकारात्मक बाब आहे.  - मिलिंद रथकंठीवार , नियोजित अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय सावरकर साहित्य संमेलन

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपाGovernmentसरकारElectionनिवडणूक