शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्चअखेर पूर्ण करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 18:29 IST

पालिकेचे पुन्हा एकदा आश्वासन

ठळक मुद्देकाम पूर्ण होईपर्यंत टँकरने होणार पाणीपुरवठायेत्या आठ दिवसात स्थानिक लोकप्रतिनिधीची बैठकीत निर्णय घेण्यात येणार

पुणे :- कळस, धानोरी, वडगाव शेरीसह शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारी भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्च 2020 अखेर पूर्ण केली जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक व्ही. जी. कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा आज सर्वसाधारण सभेत दिली. दरम्यान, हे काम होईपर्यंत या भागाला आवश्यक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकर द्वारे करण्याबाबत येत्या आठ दिवसात महापौर दालनात स्थानिक लोकप्रतिनिधी ची बैठकीत निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन यावेळी उपमहापौर दर. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले. पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत आज सुरवातीलाच शहराच्या पूर्व भागातील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेवरून प्रशासनास धारेवर धरले. गेली अडीच वर्षे केवळ उद्या होईल, थोडेच काम बाकी आहे अशी आश्वासने दिली जात आहेत मात्र हा भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होइपर्यंत पाणीपट्टी आकारू नका अशी मागणी यावेळी केली. यावर प्रशासनाकडून, भामा आसखेड च्या जॅकवेल चे काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करून, संपूर्ण प्रकल्प मार्च 2020 पर्यंत पूर्ण केला जाईल असे सांगितले. मात्र हे सांगतानाच जर आंदोलने झाली नाही तर हेही शक्य असल्याचे प्रशासनाने सांगितले. आहे. तसेच रखडलेले साडेतीन किमी च्या पाईप लाईनचे काम पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.         अनिल टिंगरे यांनी, भामाअसखेड योजनेचे काम बंद आहे. त्यातच लष्कर केंद्रातून  पाणी पुरवठ्याची वाहिनी फुटल्याने दोन दिवसांपासून पाणी नाही व पाणी मिटर लावल्याने पाणी चढत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमच्या भागात भामा आसखेड योजनेचे पाणी येत नाहीत तोपर्यंत मिटर लावू नयेत अशी मागणी केली. योगेश मुळीक यांनी, आवश्यक ती आर्थिक तरतूद करून ही हे काम पूर्ण का होत नाही याचा खुलासा प्रशासनाकडून मागितला. महेंद्र पठारे यांनी, अजित पवार पालकमंत्री असताना भामा आसखेड योजनेचे काम सुरू झाले. परंतु तेथील स्थानिक आमदारानी विरोध केल्याने हा प्रकल्प रखडला असल्याचा आरोप केला. स्थानिक एजंट शेक?्यांना मिळणा?्या नुकसान भरपाई तुन कमिशन खात आहेत. या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करावे. अविनाश साळवे म्हणाले, पालिकेची इच्छाशक्ती नसल्याने काम रखडले असल्याचा आरोप केला तर, गणेश ढोरे म्हणाले, अडीच वर्षे झाली 11 गावे पालिकेत समाविष्ट होऊन आजही अनेक गावांत 8 - 10 दिवस पाणी येत नाही त्यामुळे मिळकत भर भरणार नाही असा इशारा दिला. यावेळी हडपसर च्या पूर्व भागात व फुरसुंगी येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.आहे.------पुणे शहराच्या पूर्व भागातील समाविष्ट 11 गावांना अद्यापही भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे आज सर्वसाधारण सभेत आंदोलन झाले. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अधिक होते. गेली कित्येक वर्षे गप्प असलेले हे सदस्य आज जागे झाले यामुळे विरोधीपक्ष सदस्यांनी तुमच्या सदस्यांना तरी या विषयावर बोलू द्या असा आग्रह धरला. तर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आंदोलन करतात ही खेदाची बाब असल्याची टीका यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी