शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

दररोज भांडण्यापेक्षा 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:44 IST

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 पर्यत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देपरस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्याची संख्या सर्वाधिक

युगंधर ताजणे- 

पिंपरी : दिवस रात्र त्यांच्यात चाललेली भांडणे घरातल्या सगळ्यांना नकोशी झालेली, उच्चशिक्षित असून, दोघांना भरभक्कम पगार असताना छोट्यामोठ्या कारणाने वादाला सुरुवात व्हायची, यातून एकमेकांना मानसिक त्रास व्हायचा. कितीही प्रयत्न केला तरीही नाते पून्हा रुळावर येणार नाही असे कळल्यानंतर मात्र 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं असा विचार करून वेगळं होण्याचा निर्णय अनेक जोडप्यांनी घेतला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन नवीन वाट निवडणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 पर्यत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत. तर या काळात संमतीने विभक्त होण्याचे एक हजार 912 दावे निकाली निघाले आहेत. एकतर्फी घटस्फोट, नांदवयास येण्यासाठी आणि विवाह रद्द बातल करण्यासाठी 1 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्टअखेरीस चार हजार 273 अर्ज आले आहेत. या कालावधीत याबाबतचे 3 हजार 484 अर्जांवर निकाल देण्यात आला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्याची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. यामागील कारण सांगायचे झाल्यास यापूर्वी मेडीएशनचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यातून तडजोडीचे महत्व जोडप्यांना समजावून सांगण्यात आले. पैसा, वेळ याची यातून बचत होणार असल्याचे त्यांना पटवून देण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार जुळून आले तर काहींनी संमतीने विभक्त होण्यास पसंती दिली. कोरोनाच्या संसर्गामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा फटका अनेक जोडप्यांना बसला आहे. यात प्रामुख्याने आर्थिक अडचण, पगार - नोकरी कपात ही कारणे घटस्फोट घेण्यामागे असल्याचे कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या वकिल व समुपदेशक यांनी सांगितले. 

* आयटीयन्सची संख्या सर्वाधिक, वयोगट 30 च्या पुढे एकमेकांच्या संमतीने काडीमोड घेण्याचे दावे दाखल करण्यात सर्वाधिक संख्या आयटीयन्सची आहे. उच्चशिक्षित कुटुंबे, भरपूर पगार, आणि यामुळे वाढत चाललेली अहंपणाची भावना याचा परिणाम नात्यावर झालेला दिसून येत आहे. एकमेकांना जास्त समजून घेण्यापेक्षा झटपट नाते तोडून पुन्हा दुसरे नाते जोडण्यावर त्यांचा अधिक भर असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय घरच्या व्यक्तींचा नको तितका हस्तक्षेप नवरा बायकोच्या संसारात असल्याने त्याचा परिणाम नात्यावर होतो. मात्र वाद किंवा भांडणात या गोष्टी लक्षात येत नसल्याचे द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांनी सांगितले. 

* 'म्युच्युअली घटस्फोट घेण्याचे कारण काय ? - एकमेकांची बदनामी होत नाही, संमतीने पुन्हा नवीन मार्ग निवडता येतो. -आपल्या भांडणाचा परिणाम मुलांवर होऊ द्यायचा नाही. असा विचार करून घटस्फोटाचा निर्णय घेणे- शारीरिक व मानसिक त्रास कमी होण्यासाठी- मर्जीने अर्ज केल्याने द्वेष भावना निर्माण होत नाही- वेळ व पैसा वाचतो व कमी वेळा न्यायाला जावे लागते- घटस्फोटाची प्रक्रिया लवकर होते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDivorceघटस्फोटCourtन्यायालयFamilyपरिवार