शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

बेळगावच्या आशा होताहेत धुसर - लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 3:47 AM

महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण बदलत असताना विकास फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला. महाराष्ट्राने आम्हाला न्याय दिला नाही, ही भावना विदर्भ, मराठवाड्याच्या लोकांच्या मनात आजही घर करून आहे.

पुणे - महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण बदलत असताना विकास फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला. महाराष्ट्राने आम्हाला न्याय दिला नाही, ही भावना विदर्भ, मराठवाड्याच्या लोकांच्या मनात आजही घर करून आहे. आचार्य अत्रेंच्या पुढाकाराने साकार झालेले संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न, ओजस्वी पर्व विस्मरणात गेले आहे की काय, असा प्रश्न पडतो. बेळगाव महाराष्ट्रात येण्याच्या आशा धूसर होत चालल्या आहेत. महाराष्ट्र एकसंध राहू शकलेला नाही, अशी खंत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी बुधवारी व्यक्त केली. विकासाचे समन्यायी वाटप झाले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलनाध्यक्षांचे महासंमेलन आणि गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, बाल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ल. म. कडू, आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाबूराव कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. बाबूराव कानडे यांनी प्रास्ताविकात आचार्य अत्रेंच्या कार्यकर्तृत्त्वाला उजाळा दिला.देशमुख म्हणाले, ‘बुद्धी आणि भावनेला आवाहन करणारे लेखन हे अत्रेंचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या लेखनामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमदार झाली आणि महाराष्ट्र आकाराला आला. सध्या संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न विरले आहे. स्वतंत्र विदर्भ मागणी होत असून त्याला भाजपाचा पाठिंबा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या तत्त्वाचे पालन झाले नाही, हे वास्तव आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयापासून आपण किती दूर गेलो, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. अत्रे यांच्याकडून निर्भयता शिकली पाहिजे.लेखक हा समाजाचा आरसा असेल तर त्याने लेखनातून समाजाचे आक्रंदन, व्यथा मांडल्या पाहिजेत. अत्रे यांच्या ‘घराबाहेर’ नाटकावर पुढे महेश भट यांनी ‘अर्थ’ चित्रपटाची निर्मिती केली होती. आता काळ असा आहे की मोठे नेते होणार नाहीत. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने मोठे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण, राजकारण या क्षेत्रात घसरण होत आहे. अत्रे यांच्या साहित्याचे वाचन, चिंतन, मनन करून त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. हे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.’बालसाहित्याची होतेय परवडअत्रेंसारखा माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढेही होणार नाही. त्यांच्यासारखे होणे हे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. दिग्गजांची जयंती, स्मृतीदिन तात्पुरते साजरे होतात आणि नंतर विस्मरणात जातात. मुलांवर संस्कार करणारे साहित्य आजवर निर्माण झाले, मात्र मुलांना काय आवडते हे लक्षात घेतले जात नाही.मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्याच्यावर मालकी हक्क न गाजवता त्याला केवळ पैलू पाडण्याची जबाबदारी पालकांची असते. काळाच्या ओघात मराठी भाषेचे मातेरे होत असून, बालसाहित्याची परवड होत आहे. आपली भाषा, संस्कृती जपली जाणार असेल तरच बालसाहित्याला चांगले दिवस येतील, असे ल. म. कडू याप्रसंगी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या