शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चेबांधणीला सुरुवात

By admin | Updated: November 12, 2015 01:50 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे.

आविष्कार देसाई, अलिबागग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नजर टाकल्यास सर्वच राजकीय पक्षांची पावले स्थानिक पातळीवरील सोयीस्कर राजकारणाकडे पडत असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, खालापूर, सुधागड-पाली येथील ग्रामपंचायचींचे रुपांतर आता नगरपंचायीतीमध्ये होणार आहे. प्रशासनाने त्या दिशेन आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. प्रामुख्याने माणगाव नगरपंचायतीचे आरक्षण खुल्या प्रवर्गाच्या पुरुषासाठी आले आहे. म्हसळा-इतर मागास वर्गीय (पुरुष), तळा, पोलादपूर आणि खालापूर नगरपंचायतींसाठी खुला वर्गाची महिला विराजमान होणार आहे. सुधागड-पाली नगर पंचायतीच्या निवडणुकीला न्यायालयीन कारणामुळे स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील आरक्षण काढण्यात आलेले नाही.नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सध्या रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे सख्य वाढल्याने त्यांची आघाडी नगर पंचायतीच्या निवडणूकीतही कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना-भाजपा हे जिल्ह्यातील निवडणूकीसाठी शेकापचे शत्रु राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सुपडासाफ झाल्याने काँग्रेस अद्यापही त्या पराभवाच्या छायेतून बाहेर आल्याचे दिसत नाही. त्यांनी नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निश्चय केला आहे. युती- आघाडी बाबत कोणाकडून विचारणा झाल्यास त्यावर पक्ष विचार करेल जिल्हा काँग्रेसचा होरा आहे.भाजपाला निवडणूक लढवाची असून अद्याप युती-आघाडीबाबत निर्णय झाला नसून स्थानिक राजकारणाचा विचार करुन निर्णय घेण्यावर त्यांचा कल असल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करुनच हि निवडणूक लढविली जाईल असे एकंदर चित्र आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सोयीस्कर राजकारणाचा डाव येथे खेळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.शिवसेना आणि भाजपा सोडून इतर मित्र पक्षाबरोबर ही निवडणूक लढविली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातींच्या निवडणुकीत शेकापने उत्तम विजय संपादीत केला आहे. नगर पंचायतीवरही आमचे वर्चस्व राहील.- आमदार जयंत पाटील , सरचिटणीस, शेकापनगर पंचायतीची निवडणूक लढणार एवढे निश्चित आहे. युती कोणत्या पक्षाबरोबर करायची हे ठरलेले नाही. याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा त्यावेळी जरूर विचार केला जाईल.- बाळासाहेब पाटील,जिल्हाध्यक्ष, भाजपा