शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कोणीही व्हा; पण महागाई कमी करा...! पुणेकरांच्या शिंदे सरकारकडून अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 09:46 IST

राजकीय सत्तांतरानंतर सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली भावना

पुणे : एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु, बंडखोरी करून त्यांनी चुकीचे केले आहे. शेवटी मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. मुख्यमंत्री कोणीही असो; मग तो रिक्षा ड्रायव्हर असो किंवा चहा विकणारे. आम्हाला काहीही फरक पडत नाही. गॅस स्वस्त करा, जीवनावश्यक वस्तू स्वस्त करा, महागाई कमी करा, आरोग्यदायी सुविधा आणि शिक्षणही स्वस्त करा, यातच आमचे समाधान, अशी भावना पुणेकरांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्रिपदी निवडून आलेले एकनाथ शिंदे यांनी साेमवारी विधानसभेत बहुमत शाबीत केले. त्यावर पुणेकरांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला असता अनेकांनी वरील मत व्यक्त केले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचे बहुसंख्य नागरिकांना रुचले नसल्याचे यात दिसून आले. आता त्यांनी सरकार स्थापन केलेच आहे, तर लोकहिताची कामे करावीत, महागाई कमी करावी, शिक्षण स्वस्त करावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

नागरिक म्हणतात...

- अजय कदम (पेट्रोल पंप कर्मचारी) : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ही आनंदाची बाब आहे. परंतु, बंडखोरी करून चुकीचं केलं. शेवटी मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला.- गणेश कांबळे (रिक्षा चालक) : मुख्यमंत्री कोणीही असो, मग तो रिक्षाचालक असो किंवा चहा विकणारे, आम्हाला काही फरक पडत नाही. गॅस स्वस्त करा. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या. महागाई कमी करा.- अशोक परदेशी (फळाचे दुकानदार) : एकनाथ शिंदे माणूस म्हणून उत्तम आहे. खरा शिवसैनिक आहे. महाराष्ट्र सरकारसाठी बदल घडवेल आणि चांगले काम करेल.- गंगाराम पाटोळे (शाळा क्लार्क) : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, चांगली गोष्ट आहे; पण बंडखोरी करून शिवसेनेला धोका दिला. ज्यांनी आपल्याला मोठे केले, त्यांना धोका दिला. आता तरी त्यांनी लोकहिताची कामे करावीत.- सुरंदर दंबे (चहा दुकानदार) : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला. गद्दारी करून सत्ता बळकावलेले हे सरकार काय जास्त दिवस टिकणार नाही. दोन वर्षांनंतर कोण विचारणार यांना. आता सरकार स्थापन केले तर महागाई कमी करावी.- संभाजी शेंडकर (बँक कर्मचारी) : एकनाथ शिंदे माणूस चांगला आहे; पण बंडखोर आहे. कुठल्याही पक्षाचा असो किंवा रिक्षा चालक असो, बंडखोर नेता महाराष्ट्राच्या राजकारणात टिकत नाही.- अमोल खुडे (डिलिव्हरी बॉय) : कोणीही एकदा मंत्री किंवा मुख्यमंत्री हाेताे याचेच बघतो. सामान्य जनतेचा त्याला विसर पडतो. त्यांनी जनतेची कामे करून लाेकांची मने जिंकावी, तरच त्यांचा पुढे निभाव लागेल.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री