शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

बारा महिने पाण्याची खात्री द्या, हर्षवर्धन पाटलांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:31 IST

बारामती : ‘मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. इंदापूरला उपाशी ठेवून इतरांना तुपाशी ठेवण्याची भूमिका मान्य नाही. त्यामुळे जलसंपदामंत्री ...

बारामती : ‘मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. इंदापूरला उपाशी ठेवून इतरांना तुपाशी ठेवण्याची भूमिका मान्यनाही. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेऊन नीरा नदीवरील बंधाऱ्यात १२ महिने पाणी राहील याची खात्री द्यावी; अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. वेळप्रसंगी जनआंदोलन उभारण्याचा इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास नीरा नदीतून बोगद्यातून भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. परिणामी नीरा खोºयातील शेती अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मूळ योजना कुंभी कासारी कोयना अशी आहे.

कुंभी, कासारी, कोयनेतून दर वर्षी १०० टीएमसी पाणी वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी सोमंथळी (ता. फलटण) येथे आणून नीरा खोºयात आणायचे. त्यातून २५ टीएमसी पाणी बोगद्यातून उजनीला द्यायचे. त्यानंतर उजनी जलाशयातून ‘ओव्हरफ्लो’ होणारे २५ टीएमसी पाणी बोगद्यातून मराठवाड्याला द्यायचे नियोजन, या मूळ योजना प्रकल्पात होते. हा मंत्रिमंंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे हा मूळ प्रकल्प मान्य आहे. मात्र, या शासनाने कुंभी कासारी कोयना प्रकल्प सुरूकेला नाही. थेट त्यांनी नीरा खोºयातील बोगद्याचे काम सुरू केले. त्यावर आमचा आक्षेप आहे. या बोगद्यातून निरा खोºयाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. गेल्या २० वर्षांत नीरानदीतून एकदा सुद्धा ५ टीएमसी पाणीसुद्धा वाहून जात नाही. नीरा खोºयातील पाण्यावर नीरा देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी चार धरणांत सर्व पाणी अडवले आहे. त्यामुळे त्यातून पाणी खाली वाहत नाही. नीरा खोºयातच पाणी नाही. मग,२५ टीएमसी पाणी बोगद्यातून देणार कसे? बोगदा बांधण्याचे नियोजन चुकल्याने उजनीतील मृतसाठा देखील शिल्लक राहणार नाही.मराठवाड्याला पाणी देताना बंधाºयांचा विचार होणारच नाही. यामध्ये बारामती, इंदापूर, फलटण तालुक्यांतील गावांचे नुकसान होणार आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील अधिक गावांचा समावेश आहे. याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने बैठक घ्यावी. त्यामध्ये इंदापूरला १२ महिने पाणी देण्याबाबत आदेश काढावा.नीरा नदीवरील बंधाºयात १२ महिने पाणी राहील याची खात्री द्यावी. समन्याय पाणीवाटपाचे तत्त्व लागू केल्यास नीरा खोºयातील पाणीवाटपात मराठवाड्याचा काय संबंध, असा सवाल पाटील यांनी केला आहे.उजनीच्या सर्व पाण्याचे वाटप झाले आहे. उजनीचा पाणीकोटा शिल्लक नाही. उजनीत पाणी शिल्लक नसल्याने अतिरीक्त पाणी उजनीमध्ये टाकून ते पाणी बोगद्यातून मराठवाड्याला द्यायचे आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री महाजन यांनी बैठक घ्यावी, असे पाटील म्हणाले.नीरा नदीच्या काठावरील १९ बंधारे आहेत. ते राज्य सरकारने स्वखर्चाने बांधले आहेत. त्याला राज्य शासनाने पाणी परवनागी दिली आहे. सगळ्या शेतकºयांच्या शेती योजनेचे, पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या पाण्याचे काय करणार, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

मराठवाड्याला पाणी नेण्यासाठी मूळ योजनेप्रमाणे कुंभी कासारी कोयनेचे १०० टीएमसी पाणी नीरा खोºयात आणा, अशी आमची मागणी आहे. मूळ योजना नीरा खोºयातील २५ टीएमसी पाणी देण्याची नाही. पहिला टप्पा काढून टाकला, दुसरा आणि तिसºया टप्प्याचे काम सुरू केले.

जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील बंधाºयात १२ महिने पाणी राहील याची खात्री द्यावी. बंधाºयात पाणी इंदापूरसाठी आरक्षित करून वरचे उर्वरित पाणी त्यांना द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :WaterपाणीBaramatiबारामती