शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

काळजी घ्या! पुरुषांपेक्षा महिलांना वातरोगाचा धोका जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 08:28 IST

धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे संधिवाताचे रुग्ण वाढत आहेत...

पिंपरी : कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांबरोबरच संधिवातदेखील भारतात वेगाने वाढत आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे संधिवात वाढत आहे. शंभरमध्ये सतराजणांना संधिवाताने जखडले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते.

धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे संधिवाताचे रुग्ण वाढत आहेत. या आजारात सांधे आणि त्यांच्याशी संबंधित स्नायू, अस्थिबंध यांना आजार होतात. संधिवात हा दुर्धर आजार मानला जातो; परंतु तो आजार नसून लक्षण आहे. त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. वेळेत इलाज घेतले जात नसल्याने गुडघेदुखीत वाढ होते.

महिलांमध्ये अधिक प्रमाण..

संधिवात साधारणतः पन्नाशी उलटलेल्यांना होतो. देशातील हे प्रमाण १७ टक्के असून, त्यात महिलांमध्ये प्रमाण अधिक आहे. महिला जमिनीवर बसून काम करतात. वाढलेल्या वजनाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्यात या आजाराचे प्रमाण जास्त आहे. संधिवाताकडे दुर्लक्ष केल्याने बहुतेक रुग्णांना उर्वरित आयुष्य अपंगांसारखे काढावे लागते.

युवापिढीत वाढतोय आमवात..

शरीरातील सांध्यामध्ये दुखणे येणे म्हणजे संधिवात असतो. यातीलच आमवात हा प्रकार असून, तो रक्तातून उद्भवतो. संधिवातामध्ये प्रामुख्याने पायाचे गुडघे दुखतात. परंतु, आमवात रक्तातून होत असल्याने तो शरीरातील प्रत्येक सांध्यापर्यंत पोहोचत असल्याने सर्व शरीराला दुखणे लागते. सुरुवातीला लहान जॉइंट म्हणजे बोटांच्या सांध्यापासून त्याची सुरुवात होते. आमवाताचे प्रमाण युवापिढीमध्ये म्हणजे तिशीनंतर येत असतो.

संधिवात होण्याची कारणे...

- वार्धक्य, सांध्यांना पूर्वायुष्यात झालेली इजा आणि अतिश्रमामुळे झीज

- बैठी कामे आणि व्यायामाच्या अभावाने आलेली स्थूलता

- ‘ड’ जीवनसत्त्व मिळू न शकल्याने दुर्बल झालेली हाडे

- अतिधूम्रपान तसेच कॉफीच्या अतिसेवनाने आमवात वाढतो.

अशी घ्यावी काळजी...

- योग्य पद्धतीने नियमित व्यायाम

- पोहणे किंवा सायकलिंग करणे

- उंचीच्या योग्य प्रमाणात वजन राखणे

- अचूक निदान व योग्य उपायांबाबत जागरूकता

- लक्षणे आढळताच तज्ज्ञांचा सल्ला व इलाज

टॅग्स :PuneपुणेHealth Tipsहेल्थ टिप्स