शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बीडीपी, कचरा, खंडपीठ गाजणार

By admin | Updated: December 7, 2015 00:25 IST

नागपूर येथे सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शहरामध्ये जैववैविध्य उद्यान आरक्षणात (बीडीपी) बांधकामाला परवानगी देणे,

पुणे : नागपूर येथे सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शहरामध्ये जैववैविध्य उद्यान आरक्षणात (बीडीपी) बांधकामाला परवानगी देणे, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा उपलब्ध होणे, पुण्यामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दरड कोसळणे, भामा-आसखेड पाइपलाइन आदी विषय चर्चेला येणार असून यावर ठोस निर्णय घेतले जाण्याची वाट पुणेकर पाहत आहेत.शहरामधील आठही मतदारसंघांतून सत्ताधारी भाजपाचे आमदार निवडून आले आहेत, विरोधी पक्षातील एकही आमदार निवडून न आल्याने पुण्याचा आवाज आक्रमकपणे विधानसभेसमोर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. विधान परिषदेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून खिंड लढविली जात आहे. भाजपा-शिवसेना सरकारने नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, या काळात प्रश्नांचा प्राधान्यक्रम व निकड शासनाच्या लक्षात आली असून आता त्यांच्याकडून त्यावर कार्यवाही अपेक्षित केली जात आहे.शहरातील टेकड्या वाचविण्यासाठी राज्य सरकारने ३ महिन्यांपूर्वी बहुचर्चित बीडीपी आरक्षणाला मंजुरी देऊन १७०० हेक्टर जमिनीवर आरक्षण टाकले आहे. मात्र, या आरक्षणामुळे अनेकांना बेघर व्हावे लागणार असल्याने त्याला नागरिकांकडून विरोध होत आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर काही दिवसांपूर्वी पुण्यात आले असता महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन बीडीपी क्षेत्रात आरक्षणाचा मोबदला म्हणून १० टक्के बांधकामाला परवानगीची मागणी केली होती. या प्रश्नांबाबत शहरातील काही आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत शासनाची भूमिका जाहीर करून नागरिकांना दिलासा देण्याची शक्यता आहे.उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी दिलेली डेडलाइन उलटून गेली आहे, मात्र अद्याप पर्यायी जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. पिंपरी-सांडस येथील वनविभागाची जागा कचरा डेपोसाठी देण्याचा निर्णय झाला असून त्यावर अद्याप कार्यवाही मात्र झालेली नाही. शासनाला यावरही लवकर तोडगा काढावा लागणार आहे.पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर यंदा पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचे अनेक प्रकार घडले. हे प्रकार रोखण्यासाठी अनेक दिवस एक्स्प्रेसवे बंद ठेवावा लागला, या पार्श्वभूमीवर यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, याची विचारणा आमदारांनी तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे. त्याचबरोबर भामा-आसखेड पाइपलाइन, मांजरी येथील उड्डाणपूल, मांजरी-केशवनगर पाइपलाइन अशा अनेक प्रश्नांवर शासनाला उत्तर द्यावे लागणार आहे. पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांना परंपरेनुसार हक्क व अधिकार दिले जावेत, बीडीपी निर्णय घेतला जावा आदी प्रश्नांबाबत आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणीटंचाई, महिलांना मंदिर प्रवेश आदी विषयांना प्राधान्यांने चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर देवस्थानांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे, शीना बोरा हत्याकांड, डान्सबार स्थगिती, डाळ उत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ, अंगणवाडीसेविकांची पदोन्नती, सेवा हमी कायदा याबाबत लक्षवेधी मांडली आहे. - नीलम गोऱ्हे (आमदार) शहरातील जागेचे रेडीरेकनर दर निश्चित करण्यासाठी शासनाने एक धोरण ठरविणे आवश्यक आहे, त्याकरिता एक समिती नेमण्यात यावी. त्यामध्ये आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक व संबंधित क्षेत्रातील लोकांचे प्रतिनिधी घेण्यात यावेत. राज्यातील सर्वच शहरांना कचरा प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरावर सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी. या समितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर कचरा प्रश्नावर कसा मार्ग काढला आहे, त्याकरिता कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, याचा अभ्यास करून त्यावरचे उपाय सुचवावेत. पोलीस ठाण्यांची हद्द ठरविण्याचे अधिकार त्या त्या भागातील पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांना द्यावेत आदी विषय प्रामुख्याने विधानसभेत मांडणार आहे.- विजय काळे (आमदार)