शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बारामतीचा जिरायती भाग : ज्वारीची कणसे काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 03:14 IST

बदलत्या तापमानामुळे बारामतीच्या जिरायती भागात जोमात असलेल्या ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिकटा पसरलेला दिसून येतो. गेल्या ४ ते ५ वर्षांत यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.

बारामती - बदलत्या तापमानामुळे बारामतीच्या जिरायती भागात जोमात असलेल्या ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिकटा पसरलेला दिसून येतो. गेल्या ४ ते ५ वर्षांत यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, तापमानातील चढउताराने मालदांडीवर चिकट्याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकºयांमधुन व्यक्त होत आहे.बारामतीच्या जिरायती भागात मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची लागवड करण्यात येते. यंदा गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत जिरायती भागात पर्जन्यमानाचे प्रमाण समाधानकारक आहे. त्यामुळे शेतकºयांनी हक्काचे पीक समजल्या जाणाºया मालदांडी ज्वारीची लागवड केली. ही लागवड चांगली झाली. ज्वारी पिकेदेखील जोमदार आली. पिके फुलण्याच्या अवस्थेत असताना तापमानातील बदलामुळे ज्वारी काळवंडली आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून असणाºया तापमानातील बदलाचा फटका येथील शेतकरी अनुभवत आहेत. रात्री, पहाटे कडाक्याची थंडी आणि दिवसा प्रखर ऊन अशा तापमानाला सध्या बारामतीकर सामोरे जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अचानक थंडीचे प्रमाण वाढल्याने पिकांवर चिकटा वाढला आहे. ज्वारीची कणसे फुलताना ज्वारीचे दाणे भरतात. मात्र, चिकट्यामुळे हे चित्र बदलले आहे. ज्वारीपिकाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये घट होणार आहे. शिवाय ज्वारीचा कडबा खराब झाला आहे. कडबा लालसर, काळपट झाला आहे. बागायती भागात अधिक पाणी दिलेले ज्वारीपीक अधिक खराब झाले आहे. जिरायती भागात ज्वारी पिकाच्या उंचीवर परिणाम झाला आहे.बारामती तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की बदलत्या हवामानामुळे ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यातून चिकट्याचे प्रमाण वाढले. याबाबत शेतकºयांना यापूर्वीच दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या ज्वारीपीक परिपक्व अवस्थेत आहे. त्यामुळे चिकट्यावर उपाययोजना करणे शक्य होणार नाही, असे बरकडे म्हणाले.कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की मोठ्या प्रमाणात ज्वारी, मका, बाजरी पिकावर चिकटा वाढला आहे. सर्वच पिकांवर रासायनिक फवारणी करू नये. रासायनिक औषधांऐवजी निमअकर् ाचा वापर करावा. या एकाच औषधामुळे भाजीपाल्यावरील भुरी रोगासह सर्व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.'मालदांडी फुलण्याऐवजी कोमातबारामतीचा जिरायती भाग मालदांडी ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये मिळणाºया ज्वारीचा दर्जा चांगला असतो. खाण्यासाठीही ज्वारी चांगल्या प्रतीची, पौष्टिक मानली जाते.४साहजिक याच पिकाच्या मोठ्या लागवडीस प्राधान्यदिले जाते. मावा किडीमुळे ज्वारीवर चिकटा पडला आहे.४यंदा हे पीक काळवंडल्यामुळे कोमात गेले आहे. त्यामुळे खाण्यासाठी ज्वारी मिळेल,पण जनावरांना चांगला चारा (कडबा) मिळणार नाही.कडब्याचेदर ढासळणार४ज्वारी पिकाबरोबरच त्या पिकाच्या कडब्यातून शेतकºयांना उत्पन्न मिळते. ज्वारीबरोबर कडब्याचे दुहेरी उत्पन्न शेतकºयांना मिळते. त्यावर पिकाच्या फायद्याची गणिते अवलंबून असतात.४३ हजार रुपये प्रतिशेकडाअसा कडब्याचा दर आहे.मात्र, यंदा हा दर दोन तेअडीच हजार रुपयांवर ढासळण्याची शक्यता आहे.४खराब कडब्याला कमी दर मिळण्याची भीती काºहाटी येथील शेतकरी शिवाजी वाबळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीPuneपुणे