शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बारामती सलग दुसऱ्या वर्षी ‘अस्वच्छ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:36 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या स्पर्धेत बारामती शहर सलग दुसऱ्या वर्षी ‘अस्वच्छ’ ठरले आहे.

- रविकिरण सासवडे बारामती : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या स्पर्धेत बारामती शहर सलग दुसऱ्या वर्षी ‘अस्वच्छ’ ठरले आहे. राज्यातील एकलाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीतील ९९७ शहरांमध्ये बारामती ३२५ व्या निचांकी स्थानावर बारामती फेकली गेली आहे. मात्र, या सर्वेक्षणामध्ये सर्टिफिकेशन या प्रकारामध्ये ओडीएफचे १५० गुण व २ स्टारचे ३५० गुण न धरल्याने बारामतीला हा फटका बसला आहे, असा दावा मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.जिल्ह्यात इंदापूर, सासवड, भोर, जेजुरी, तळेगाव दाभाडे आणि दौंड आदी शहरे बारामतीपेक्षा वरचढ ठरली आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत सलग दुसºयावर्षी बारामती निचांकी पातळीवर घसरली आहे. या स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बारामती शहराच्या ‘अस्वच्छतेचा’ मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजकीय अस्पृश्यतेमुळे मुल्यांकनात बारामतीला फटका बसल्याचा आरोप नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी केला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात विविध विभागांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा घेण्यात आली. एक लाखापेक्षा कमी व त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा स्वतंत्र गटात समावेश करण्यात आला. तसेच पुर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि उत्तर-पुर्व असे पाच झोन करण्यात आले होते. राज्य पातळीवर एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ९९७ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये बारामती शहर ३२५ व्या क्रमांकावर राहिले आहे. सर्वेक्षणातील एकुण ५ हजार गुणांपैकी बारामतीला २ हजार ५२७ गुण मिळाले आहेत.या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या कराड शहराला सुमारे ४ हजार ६३ गुण आहेत. तसेच सासवड, इंदापूर, भोर, जेजुरी, तळेगाव दाभाडे, दौंड ही बारामतीपेक्षा तुलनेने कमी विकसित शहरेही पुढे गेली आहेत. बारामती शहरातील रस्ते, शहराचे नियोजन, रिंग रोड, शहरातील कचरा गोळा करणे, स्वच्छता तसेचइतर बाबतीतील विकासाची स्थिती तुलनेने चांगली आहे. राजकारणाचे पॉवर ग्रीड असलेले शहर विकासाच्या बाबतीतही पुढे असल्याने अनेकांना भुरळ पडते. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमवारी न पटणारी असल्याची चर्चा बारामतीकरांमध्ये सुरू झाली आहे.> बारामतीच्या नावाची राज्यकर्त्यांना अ‍ॅलर्जी : किरण गुजरयाविषयी ‘लोकमत’ शी बोलताना ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर म्हणाले, बारामती शहर कचराकुंडीमुक्त आहे. कचरागाड्या प्रत्येक घरी कचरा गोळा करण्यासाठी पोहचतात. शहर १०० टक्के हगणदारी मुक्त आहे. मात्र, बारामती शहराला राजकीत अस्पृश्यतेचा फटका बसत आहे. बारामतीच्या नावाची अ‍ॅलर्जी सध्याच्या शासनाला आहे. परिणामी बारामतीचे स्टार मानंकनातील हक्काचे ३५० गुण दिले गेले नाहीत. तसेच ओडीएफचे १५० असे ५०० गुण दिले नाहीत. बारामती शहराती १८ पटीने हद्दवाढ झाली. तीन वर्षांपूर्वी बारामती नगरपरिषद ‘अ’ वर्गामध्ये आली. बारामती शहर हगणदारीमुक्त, कचराकुंडी मुक्त तसेच भूमीगत गटारी या गोष्टी या मुल्यांकनामध्ये विचारातच घेतल्या गेल्या नाहीत. ४.६४ किलोमिटर हद्दीसाठी असणारे फक्त ६५ सफाई कामगार आपल्याकडे आहेत.मात्र, शहराची हद्द वाढ देखील १८ पटींनी झाली आहे. ५५ चौरस किलोमिटरहद्द झाली आहे. त्यामानाने हे सफाई कामगार कमी आहेत. राज्य शासनाने बारामती नगरपरिषदेचा ‘अ’ वर्गाचा आकृतीबंद अद्याप मंजुर केला नाही. हा आकृतीबंद मंजुर झाल्यास कायमस्वरूपी ३०० सफाई कामगार बारामती नगरपरिषदेकडे उपलब्ध होऊ शकतात.बारामती शहराच्या आजूबाजूच्या वस्त्यांची लोकसंख्या अधिकआहे. या लोकसंख्येचे समावेश शहरातील लोकसंख्येमध्ये धरला जात नाही. मात्र नगरपरिषदेलाच या लोकसंख्येला सर्व सुविधा पुरवाव्या लागतात. ही लोकसंख्या जवळपास तीन पटआहे. बारामती नगरपरिषदेकडून पाठवलेल्या वेगवेगळ््या प्रस्तावांना बगल दिली जाते. लवकर मंजुरी मिळत नाही. एखादे काम नगरपरिषदेने हाती घेतले की स्थानिक विरोधक विरोधासाठी विरोध करतात. ‘बारामती पॅटर्न’ला मुद्दम धक्का लावण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात आहे. मात्र घसरलेले मुल्यांकनावर विचार करून अधिकाधिक सुधारणा करण्याचा नगरपरिषदेकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.>गुणांकनाची फेरतपासणी करण्याची मागणी...सर्टिफिकेशनमधील गुणांकनाची फेरतपासणी करण्याची मागणी राज्या अभियान संचालक यांच्याकडे मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी तर प्रधान सचिवांकडे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी पत्राद्वारे केली आहे. मुख्याधिकारी योगेश कडुसकर म्हणाले, बारामती नगरपरिषदेला राज्य शासनाकडून १४ डिसेंबर २०१८ ला ०२ स्टार मानांकन प्राप्त झाले होते. त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०१९ करीता ३ स्टार मानांकनाकरीता सहभाग घेतला होता. तसेच बारामती शहर १०० टक्के हगणदारीमुक्त असून त्याबाबतचा प्रस्ताव ‘ओडीएफ’ व ‘ओडीएफ’ प्लस पहाणीसाठी स्वच्छ भारत पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड केला होता. परंतू या स्पर्धेतील पार्ट-२ मध्ये असणाºया सर्टिफिकेशनमध्ये बारामती नगरपरिषदेस केवळ २५ गुण मिळाले. प्रत्यक्षात बारामती नगरपरिषदेस २ स्टारचे ३५० व ओडीएफचे १५० असे ५०० गुण मिळणे अपेक्षीत होते.>कराड आघाडीवरस्वच्छ सर्वेक्षणात पश्चिम विभागामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून कराडने पहिला क्रमांक मिळवला आहे. कराड शहराला ४ हजार ६३ गुण मिळाले आहेत. बारामती नगरपरिषदेस नागरिकांना सेवा देण्याच्या प्रकरात ५७४, सर्टिफिकेशनमध्ये २५ तर थेट निरिक्षणामध्ये ९९९ गुण मिळाले आहेत. तर नागरिकांचा प्रतिसाद या प्रकारातील गुण जाहिर केले नसल्याचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी सांगितले. या यादीमध्ये इंदापूर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनात पश्चिमविभागात पहिला क्रमांक मिळालाआहे. इंदापूर नगरपरिषदेस ३ हजार ७५२ गुणांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ सासवड, भोर, जेजुरी, तळेगाव दाभाडे,दौंड शहरांचा क्रमांक लागला आहे.