शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Baramati | तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 14:08 IST

सकाळी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला...

सांगवी (बारामती) : जमिनीच्या वादातून सांगवी (ता. बारामती) येथे तीन दिवसांपूर्वी विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) या तरुणाचा चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे याने दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बुधवारी (दि. १२) रोजी ही सकाळच्या दरम्यान घटना घडली होती. झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या मयत विनोद फडतरेच्या कुटुंबीयाला पाठबळ देण्यासाठी व झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि. १५) सकाळी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला.

यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. तर खून करणाऱ्या विशाल फडतरे या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी यात सहभाग घेऊन गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा मिळून सह आरोपींना कठोर शासन होण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आरोपीचे संपूर्ण कुटुंबच या कटात सामील आहे, यामुळे यातील मुख्य आरोपी इतर आरोपींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी, अशी मागणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक चंद्रराव तावरे यांनी केली. यावेळी सर्व पक्षातील पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद फडतरे यांच्या हत्येनंतर कुटुंबाला दिलासा देण्यासाठी गुरुवारी (दि. १३) ग्रामस्थांकडून तातडीची बैठक घेण्यात आली होती. गावच्या इतिहासातील ही पहिलीच दुर्दैवी घटना असल्याने विशाल फडतरे सारख्या मनोवृत्तीच्या नराधमाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावात कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुनाच्या काही तासानंतर प्रत्यक्षदर्शी खून करताना पहिलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळे आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून वारंवार चुलत भावांमध्ये वितुष्ट येत होते.

गुन्हेगारांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न ; ग्रामस्थांचा आरोप...

खून करणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र, सह आरोपी असणारे गणपत फडतरे व विक्रम फडतरे यांना फरार होण्यास पोलिसांनी मदत केली. उच्च पदस्थ लोकांच्या सांगण्यावरून व विक्रम फडतरे हा पोलीस दलात असल्याने व त्यांचे लागेबांधे असल्याने माळेगाव पोलीस इतर दोन आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आरोपींच्या अटकेबाबत पोलिसांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तिघे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे गावकऱ्यांचा पोलिस व आरोपींवरील संताप यामुळे व्यक्त होताना दिसून आला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBaramatiबारामती