शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

...लाखो शिवसैनिक त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 21:57 IST

बारामतीत शिवसेना मेळाव्यात शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला.

बारामती - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर कधीही नव्हते एवढे मोठे संकट आले. मात्र ठाकरे यांनी अठरा अठरा तास काम करुन महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढले. यावेळी काही लोकांनी संघटना तोडफोड करण्याची भूमिका घेतली. त्यांना माहिती नाही, पक्ष फुटला असेल,काही लोक गेले असतील. मात्र, लाखो शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकार्यांचा शिवसेना मेळावा शनिवारी (दि ६) सायंकाळी बारामतीत पार पडला. यावेळी पवार बोलत हाेते. यावेळी पवार पुढे म्हणाले, आज देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे.त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे.या निवडणुकीच्या माध्यमातून चुकीच्या प्रवृत्तीला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे. अनेक वेळा दिल्लीत चर्चा होते. शिवसेना राष्ट्रहिताचा विचार करते. शिवसेनेने कधीही दिल्लीसमोर स्वाभिमान कधीही झुकविला नाही. त्यामुळे हा संघर्ष लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या  प्रवृत्तीच्या विरोधात आहे. देशाच्या एक्याला सुरुंग लावला जात आहे, हे सहन केले जाणार नाही.

राष्ट्राच्या प्रश्नावर शिवसेना कधीही तडजोड करीत नाही. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष वेगळ्या पद्धतीने जावू पाहत  आहेत.दहशत निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्यांनी कितीही दमदाटी केली तरी त्यांच्या दमदाटीला भिक घातली जाणार नाही.बारामतीकडे देशाचे लक्ष आहे. दिल्लीत बारामतीची चर्चा होते,असे देखील यावेळी पवार म्हणाले.यावेळी पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतच्या मैत्रीला उजाळा दिला.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी  आजची लढाइ हि दडपशाही,दिल्लीच्या महाराष्ट्रावर होणार्या अत्याचाराविरोधातील स्वाभिमानाची लढाइ असल्याचे सुळे म्हणाल्या.यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी हि निवडणुक हुकुमशाही विरोधात लोकशाही  टीकविण्यासाठीची निवडणुक असल्याची टीका केली. यावेळी युगेंद्र पवार, राजेंद्र काळे,अविनाश बलकवडे,शरदचंद्र सुर्यवंशी,सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सुभाष ढोले आदी उपस्थित होते.

शिवसेना नेते सचिन अहिर भाषणात म्हणाले, पुरंधरला नवीन वाघ तयार झाला आहे असे वाटत होते. पण तो वाघ खोक्याच्या मागे गेला की बोक्याच्या मागे गेला माहिती नाही,असा टोला अहिर यांनी विजय  शिवतारे यांचे नाव न घेता लगावला.

टॅग्स :baramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा