शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: मुंबईत पावाच्या लादीत ५ रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलही महागले
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
6
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
7
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
8
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
9
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
10
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
11
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
12
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
13
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
14
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
15
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
16
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
17
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
18
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
19
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
20
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
Daily Top 2Weekly Top 5

बंडातात्या कराडकरांची जीभ घसरली! म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींचा अहिंसा मार्ग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:02 IST

स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली

राजगुरुनगर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरुनगर येथे २३ मार्च या शहिददिनी आळंदी ते राजगुरुनगर येथे राज्य व्यसनमुक्त युवक संघाची भक्तीपीठ ते क्रांतीपीठ पदयात्रा घेऊन बंडातात्या कराडकर येथे आले होते. यावेळी भाषणात कराडकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे.

''स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. भारताला १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे अहींसेद्वारे मिळाले नसून सशस्त्र क्रांतिकारकांच्या कष्टातून मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.'' 
 
कराडकर म्हणाले,  हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव हे देशाच्या तीन वेगळ्या प्रांतातील तरुण एका समान धाग्याने एकत्र आले. तो म्हणजे स्वातंत्र्य. परंतु हे स्वातंत्र्य महात्मा गांधींच्या अहींसा तत्वात नाही हे वेळीच ओळखून भगतसिंगानी गांधींचा मार्ग सोडून क्रांतीची मशाल हाती घेतली. तो वणवा देशभर पेटला. आणी म्हणून ब्रिटीशांना येथून काढता पाय घ्यावा लागला.

साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीने मिळाले स्वातंत्र्य 

भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या अहिंसेच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच 1947 साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942 ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया त्यामधून पोलिसांची कार्यालये, सरकारी कार्यालय पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या ज्या घटना घडत गेल्या. यातून इंग्रजांनी बोध घेतला, की आता भारत देश सोडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी असं सांगितलं जातं की 'साबरमती के संत तुने कर किया कमाल, असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांचे फोटो इथे मागे आहेत. त्या साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे, असं कराडकर म्हणाले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीKhedखेडBhagat SinghभगतसिंगIndiaभारत