शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

राज्यातील बळीराजा आता ड्राेनने करणार फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2023 14:05 IST

‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यावर कृषी विभागाने तातडीने राज्यात ३८ ड्रोनचे वाटप करण्याचे ठरवले

पुणे : शेतीकामासाठी मजुरांची कमतरता, मजुरीचे वाढते दर यावर केंद्र व राज्य सरकारने पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांना दिला. त्यासाठी अनुदानाची योजना आणली. अर्जही मागविले. सुमारे पावणेदोन कोटींचे अनुदान आले. मात्र, गेल्या वर्षभरात या योजनेची मार्गदर्शक तत्त्वेच अंतिम करण्यात आली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यावर कृषी विभागाने तातडीने राज्यात ३८ ड्रोनचे वाटप करण्याचे ठरवले आहे. त्यातील १३ ड्रोन कृषी पदवीधरांना देण्यात येणार असून, उर्वरित २५ ड्रोन संस्थांना देण्यात येणार आहेत.

ड्रोनसाठीचे हे अनुदान येत्या दीड महिन्यांत वाटप न केल्यास ते परत जाण्याची भीती व्यक्त होत होती. राज्याने यंदा ३८ ड्रोन देण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. १३ ड्रोन कृषी पदवीधरांसाठी तर २५ इतर लाभार्थींना देण्यात येणार आहेत. राज्यभरातून २२३ अर्ज आले होते. केंद्र सरकारने जानेवारी- २०२२ मध्ये ही योजना जाहीर केली. त्यानुसार, कृषी पदवीधर, विद्यापीठे, संस्था, तसेच शेतमाल उत्पादक कंपन्यांना हे ड्रोन देण्यात येईल, असे ठरले. रखडलेल्या या योजनेतील अडथळे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दूर केले असून, ३८ ड्रोनसाठी अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे.

हे आहेत निकष

- यासाठी काढण्यात आलेल्या सोडतीमधील पात्र लाभार्थींनाच ड्रोनसाठी प्रस्ताव देता येणार.- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे निवड झालेले प्रस्ताव, प्रतीक्षाधीन प्रस्तावांची यादी उपलब्ध असून या      यादीतील निवड झालेल्या लाभार्थींशी कृषी अधिकारी संपर्क साधून निवडपत्र देतील.

- कृषी अधिकारी कोटेशनसह या प्रस्तावांची छाननी करून पूर्व संमती देणार आहेत.- पूर्व संमती दिलेल्या लाभार्थींनी वेळेत ड्रोन खरेदी व प्रशिक्षण पूर्ण न केल्यास निवड रद्द होईल.

- निवड रद्द झालेल्या प्रस्तावांच्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील लाभार्थींला संधी दिली जाईल. पात्र कंपन्यांकडूनच ड्रोन खरेदी करावे लागेल.- मंजूर झालेल्या कृती आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८ ड्रोन दिले जातील. त्यात २५ ठिकाणी ड्रोनयुक्त सेवा-सुविधा केंद्रे उघडली जातील. त्याशिवाय १३ कृषी पदवीधरांना ड्रोनसाठी अर्थसाह्य मिळेल.राज्यातून जास्त अर्ज आल्यामुळे कृषी विभागाने सोडत काढली होती. मात्र, आयुक्तांनी या योजनेला जिल्हानिहाय ड्रोन देण्याची सूचना केली होती.

जिल्हानिहाय ड्रोनची संख्या

रत्नागिरी १, सिंधुदुर्ग १, नाशिक २, धुळे १, नंदुरबार १, जळगाव २, नगर २, सोलापूर २, पुणे २, सातारा २, कोल्हापूर १, सांगली १, छत्रपती संभाजीनगर २, जालना १, बीड २, लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड २, परभणी २, हिंगोली १, बुलडाणा १, वाशीम १, अकोला १, अमरावती १, यवतमाळ १, वर्धा १, नागपूर १ आणि चंद्रपूर १. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारtechnologyतंत्रज्ञानSocialसामाजिक