शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

India Post | अवघ्या ३९९ रुपयांत मिळवा १० लाखांचा विमा; सामान्य नागरिकांसाठी खास योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:55 IST

ही योजना १८ ते ६५ वयांतील व्यक्तींसाठी आहे...

पुणे : टपाल कार्यालयातर्फे सामान्य नागरिकांसाठी खास बजाज एलायंज या विमा कंपनीकडून विमा योजना सुरू केली आहे. त्यामध्ये केवळ ३९९ वार्षिक हप्ता असून, विमाधारकास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

टपाल खात्याच्या या योजनेचा गरीब व मध्यमवर्गातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. हा मोठा वर्ग आतापर्यंत स्वस्तातील विमा योजनेच्या प्रतीक्षेत होता. या विमा योजनेला टपाल खात्याची विश्वासार्हता मिळालेली आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण धारकास मिळणार आहे. ही योजना १८ ते ६५ वयांतील व्यक्तींसाठी आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयांतर्गत व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी टपाल खाते आणि विमा कंपनीत सामंजस्य करार झाला आहे. ही योजना प्रत्येक टपाल कार्यालयांतर्गत अटी व शर्तींसह तुम्हाला विमा संरक्षण देईल.

या योजनेत व्यक्तीला अवघ्या ३९९ रुपयांच्या हप्त्यामध्ये एका वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास ३० हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येतो.

तसेच रुग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवस तुम्हाला प्रतिदिन एक हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. कुटुंबाला वाहतुकीसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च मिळतो. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते.

योजनेचा कालावधी

या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करता येते.

असा करा अर्ज

तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन तिथे अर्ज भरू शकता. पोस्टात तुमचे बँक खाते असेल तर त्याअंतर्गतदेखील अर्ज सादर करू शकता.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसPuneपुणे