शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' वेळी अयोध्येला गेल्याचा आनंद आणि अभिमान!पुण्यातील कारसेवकांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 19:14 IST

जय श्रीराम हो गया काम’ अशा घोषणा देत साखर वाटप  Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan

ठळक मुद्देरामाला बंदीवानातून मुक्त केल्याची भावना

पुणे : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी राम मंदिराचे भूमीपूजन सोहळा होत आहे.त्यामुुुळे देशभरात उत्साहाचेे वातावरण आहे. पुण्यातील काही कारसेेवकांनी १९९२ सालच्या आठवणींना उजाळा दिला आहे.तसेच 'त्या' घटनेचा साक्षीदार असल्याचा आनंद आणि अभिमान आहे..अशा शब्दांत आपल्या भावना पण व्यक्त केल्या.

तो प्रसंग कायमचा ह्दयात कोरला गेलाय

शरयुच्या काठावरुन आठ दिवस आम्ही साध्वी ऋतुंबरा देवी आणि आचार्य धमेंद्र यांचे भाषण ऐकायला जात होतो. त्यातून जो जोश निर्माण केल्या जात होता, त्यामुळे सर्वच कारसेवक पेटून उठले होते. त्यातूनच बाबरीचे पतन झाले. तो सर्व प्रसंग कायमचा ह्दयात कोरला गेला असून आजही अगदी कालपरवा घडल्यासारखा हा इतिहास आठवतो, अशा शब्दांत कारसेवक जगन्नाथ कुलकर्णी यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. जगन्नाथ कुलकर्णी यांच्या वडील, दोन्ही भाऊ संघाचे स्वयंसेवक त्यामुळे लहानपणापासून ते संघ शाखेत जात. त्यातूनच त्यांच्यावर कोथरुड (संभाजीनगर) ची जबाबदारी देण्यात आली होती.

कुलकर्णी यांनी सांगितले की, पहिल्या शिलान्यास कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो, परंतु, त्यावेळी झाशीमध्येच आम्ही अडकून पडलो होतो.मात्र, दुसऱ्या वेळी कोथरुड भागातून आम्ही ९० जण दहा दिवस अगोदरच अयोध्येला गेलो.शिवाजीराव आढाव, दीपक सुर्वे, विनोद खत्री, अनिरुद्ध पळशीकर, बाळासाहेब हगवणे, अनंता सुतार, राम कडू असे अनेक संघस्वयंसेवक त्यावेळी आमच्या सोबत होते. शरयुच्या काठी तंबूत आमची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. तंबूतच काहीतरी शिजवून आम्ही सकाळी ९ वाजता भाषण ऐकायचा जात होतो. त्या १० दिवसात आम्ही पुण्यातून पाठविलेल्या शिला शोधून काढल्या होत्या.रामलल्लाचे दर्शन एकदा घेतले. प्रत्येकाने मुठभर माती घेऊन जायचे ठरले होते.त्याप्रमाणे आम्ही सकाळीच सभास्थानी पोहचलो होतो.त्या दिवशी साध्वी ऋतुंबरा देवी, आचार्य धमेंद्र यांच्या भाषणांनी कारसेवक पेटून उठले आणि एक एक जथा चबुतऱ्यावर चढू लागला. त्याबरोबर सर्वांना स्फुरण चढले. जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणून जात होता. सलग ७ ते ८ तासाच्या प्रयत्नानंतर तीनही चतुबरे पडल्यावर तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी एकच जयघोष केला. त्या आनंदात कोणीही जेवले नव्हते. येताना आम्ही तेथील मातीबरोबर घेतली. मात्र, बाबरी पडल्यानंतर खूप भीती वाटू लागली होती. पण सुखरुप घरी परतो. रामाला बंदिवानातून मोकळा केल्याचे समाधान झाले होते. तो प्रसंग आजही ह्दयात कोरल्यासारखा ताजा आहे. .

.....आणि पोह्यांचा झाला भात

शरयुच्या काठी तंबूत आम्हाला जेवण बनविण्यासाठी काही साहित्य दिले होते. त्यात घटनेच्या दिवशी आम्ही सकाळीच पोहे बनविण्याचा बेत केला होता. पण, पोहे भिजविल्यानंतर ते निथळायचे असतात, याची आम्हाला कल्पनाच नव्हती. त्यामुळे पोहे बनविताना त्याचा भात झाला. तोच खाऊन आम्ही सभास्थानी गेलो आणि त्यानंतर कारसेवकांनी बाबरीचे पतन घडवून आणले, भाजपचे तत्कालीन नगरसेवक शाम सातपुते यांनी त्यावळचा हा अनुभव अजूनही आठवला की हसायला येत, असल्याचे सांगितले.

शाम सातपुते यांनी सांगितले की, ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील दिवसाच्या दिनाला उपस्थित असल्याचा अभिमान वाटतो. माझ्याबरोबर शरद गंजीवाले, धनंजय काळे, कुमार कुसाळकर, गणेश सावंत, संजय चोरगे, महादेव उदामले, अजय चौधरी, बाळु आमकर, पवन मुळे, राजाभाऊ कदम, कै. राम कंधारे, कै.संजय तागुंदे असे गोखलेनगर, वडारवाडी भागातील ४० जण आदल्या दिवशी अयोध्येला पोहचलो होतो. पोहे करताना झालेला भात खाऊन घाईघाईतच आम्ही सभास्थानी जाऊ लागलो.

‘जय श्रीराम हो गया काम’ अशा घोषणा देत साखर वाटप अचानक कारसेवकांचा एक जथा चतुबऱ्याच्या दिशेने गेला. त्यावेळी आमच्यातील काही जण तिकडे गेले. त्यांना पाहण्यासाठी आणखी काही जण गेले. त्यांना शोधण्यासाठी आम्ही सर्वच चबुतऱ्याच्या दिशेने गेलो तर सर्व जण बाबरी पाडत होते. आम्हीही त्यांच्यात सहभागी झालो. बाबरी पडल्यानंतर एकच जल्लोष केला गेला. त्या भागात अजूनही महिला परपुरुषाच्यासमोर येत नसत. पण, बाबरी पडल्याच्या आनंदात तेथील घरांमधील महिला आमच्याबरोबर नाचल्या होत्या. ‘जय श्रीराम हो गया काम’ अशा घोषणा येत साखर वाटली जात होती. सर्वत्र जल्लोष सुरु झाला होता. आम्ही त्या जागेचे दर्शन घेऊन मग परत रेल्वेने पुण्याला परतलो. आज रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी असल्याचा अभिमान वाटतो.

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरTempleमंदिर