शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

१६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; महाराष्ट्रात कुठे कशी आहे स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 07:17 IST

राज्यातील २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६१, तर ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६८ इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क , पुणे : राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत ३३ लाख ८३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या सुमारे २४ टक्के इतकी आहे. मात्र, पूर्व विदर्भातील चार जिल्हे, नंदुरबार व पालघर जिल्ह्यांमधील १७ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे. 

मान्सून वेळेवर दाखल होऊनही त्या तुलनेत त्याची प्रगती झाली नव्हती. परिणामी, राज्यातील १४६ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.  त्यामुळेच नागपूर विभागात आतापर्यंत केवळ २.७१ टक्के तर, काेकण विभागातही केवळ ३.०९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. 

राज्यातील २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६१, तर ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६८ इतकी आहे. ७५ ते १०० टक्के पाऊस ५३ तालुक्यांमध्ये झाला आहे. 

मान्सूनने गुरुवारी पूर्व विदर्भात वाटचाल  सुरू केली आहे. या भागात आठवडाभरात पेरण्यांमध्ये वाढ होईल.     - विनय आवटे,  विस्तार व प्रशिक्षण संचालक  

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान