शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूचा बदला, सात जणांचा घेतला बळी; आरोपींचा अतिआत्मविश्वास नडला अन् फुटले बिंग

By प्रमोद सरवळे | Updated: April 25, 2023 08:38 IST

भीमा नदीच्या पात्रात एकाच वेळी सात मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाचा तपास करताना तंत्रज्ञानाचा योग्य वापर, डीएनए फिंगरप्रिंट, मोबाइल, शवविच्छेदनाचा अहवाल आणि संशय यावरून अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. marathi batmya, marathi news, marathi crime news, pune crime news

पुणे : भीमा नदीपात्रात अगोदर तीन मृतदेह सापडले. त्यानंतर पुन्हा एक मृतदेह तरंगताना दिसला. हे मृतदेह नदीपात्रातून काढल्यानंतर पुढे आणखी तीन मृतदेह आढळून आले. एकामागोमाग सात मृतदेहांमुळे पोलिसही चक्रावून गेले. नक्की काय प्रकरण आहे ते त्यांनाही समजेना. आत्महत्या तर नाही, हे प्राथमिक अंदाजाने स्पष्ट झाले. मात्र, दुसरीकडे निघोज परिसरातून सात जण बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. तपास करताना अनेक शक्यता व्यक्त केल्या गेल्या. त्यातूनच मुलाच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने नात्यातीलच सात जणांना यमसदनी पाठविल्याचे उघड झाले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या तपासाचे धागेदोरे उलगडले.

प्राथमिक माहितीवरून पोलिसांना सर्वांची आत्महत्या असल्याचे वाटत होते. एकाच वेळी तीन मृतदेह आढळल्याने माध्यमांमध्ये बातम्यांचा सपाटा सुरू झाला. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते तिघेही एकाच घरातील असल्याचे समजले. नंतर केलेल्या शवविच्छेदन अहवालात या तिघांच्या मृत्यूचे कारण पाण्यात बुडाल्यामुळे झाला होता, असे समोर आले. चौथा मृतदेह सापडल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा संशय बळावला. दुसरीकडे, निघोज परिसरातून सात जणांचे कुटुंब मिसिंग असल्याचे समोर आले. त्यातील चार जण तर सापडले होते; पण अजून तीन जण बाकी होते. पोलिसांनी भीमा नदीत युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पुढे दीड किलोमीटरवर राहिलेले तीन मृतदेह सापडले. मृतांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आणि गळा दाबल्याचे पुढे आले. निघोज व परिसरातील तपासातून फारसे काही पुढे आले नाही.

...अन् पोलिसांना संशय पक्का झाला

चौकशीसाठी पोलिसांनी मृतांच्या जवळच्या लोकांना यवत पोलिस स्टेशनला आणले. त्यामध्ये मृताचे चुलतभाऊ अशोक कल्याण पवार एकदम आत्मविश्वासाने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. मृत मोहन उत्तम पवार आणि त्यांचे कुटुंब आम्हाला नेहमी त्रास द्यायचे. त्यांचे हे नेहमीचे आहे. ते रात्री कधी निघून गेले आम्हाला माहीत नाही. त्यांच्या मुलाने एक मुलगी पळवून आणली. त्यामुळे ते निघोज परिसर सोडून गेले, असे तो सांगत होता. मृताच्या मुलाने गावातील एका मुलीला पळवून नेल्याने त्या कुटुंबाने मृतांच्या घरी येऊन धमकी दिली होती. त्यामुळेच घाबरून त्यांनी आत्महत्या केली असेल, असे अशोक पवार याने सांगितले. ही सर्व माहिती देत असताना ती व्यक्ती एकदम विश्वासाने बोलत होती.

त्यावेळी पोलिसांना काही प्रश्न पडले ते असे-

- ज्यांना आत्महत्या करायची होती, ते घरातील सामान घेऊन का गेले?

- जरी त्यांनी रस्त्यात ठरवलं की, आत्महत्या करायची तर ते सामान कुठे गेले?

- आत्महत्या करण्यासाठी इतक्या लांब का आले?

असे आले समाेर कारण...

त्याच वेळी पुणे शहर पोलिसांत एक अपघाताचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यामध्ये अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजयचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद होती. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मृत मोहन उत्तम पवार यांचा मुलगा अनिल हा धनंजयसोबत होता. त्यामुळे अनिलवर अशोक पवार आणि त्यांच्या भावांचा डोळा होता. या गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाला गती आली. जी व्यक्ती पोलिसांनी एवढ्या विश्वासाने उत्तरे देत होती, तीच मुख्य आरोपी होती, हे नंतर समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आरोपींनी सामूहिक हत्याकांड घडवून आणले होते. आरोपींमध्ये अशोक कल्याण पवार (वय ३९), शंकर कल्याण पवार (वय ३७), श्याम कल्याण पवार (वय ३५), प्रकाश कल्याण पवार (वय २४) व कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५) यांचा समावेश आहे. हे सर्व जण भाऊ-बहीण असून ते हे मृत मोहन उत्तम पवार यांचे चुलतभाऊ होत.

कसा घडला हत्याकांड?

निघोजने रात्री साडेनऊच्या सुमारास ते बीडला पिकअपने जाण्यासाठी निघाले. आरोपीचा मुलगा धनंजयचा मृत्यू आणि मृताचा फरार मुलगा अनिल या विषयावर चर्चा करण्यासाठी ते सर्व जण बीडला निघाले होते. निघोजजवळ गाडी डिझेल भरण्यासाठी थांबली. सगळे जण गाडीच्या पाठीमागे हौदात बसले होते. गाडी नगर- पुणे महार्गावरील कानिफनाथ फाट्याकडून केडगाव-चौफुल्याकडे निघाली. या रस्त्यावरच चालत्या गाडीत या सर्वांना गळा दाबून मारून टाकले. रात्री १ वाजता सर्वांचे मृतदेह पुलावरून नदीत टाकले. मृत मोहन उत्तम पवार (वय ४५), पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई (वय ४०), मुलगी राणी फुलवरे (वय २४), जावई श्याम फुलवरे (वय २८), नातू रितेश (वय ७), छोटू (वय ५), कृष्णा (वय ३) यांचा शेवटचा प्रवास ठरला. आरोपींनी ६ जणांना गळा दाबून मारले होते. तर सर्वांत लहान असणारा कृष्णा शांत बसल्याने त्याचा गळा दाबला नव्हता. आरोपींनी सर्व सहा मृतदेह भीमा नदीत टाकल्यानंतर कृष्णालाही जिवंतच पाण्यात टाकले होते.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस