शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

मुलाच्या मृत्यूचा बदला, सात जणांचा घेतला बळी; आरोपींचा अतिआत्मविश्वास नडला अन् फुटले बिंग

By प्रमोद सरवळे | Updated: April 25, 2023 08:38 IST

भीमा नदीच्या पात्रात एकाच वेळी सात मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाचा तपास करताना तंत्रज्ञानाचा योग्य वापर, डीएनए फिंगरप्रिंट, मोबाइल, शवविच्छेदनाचा अहवाल आणि संशय यावरून अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. marathi batmya, marathi news, marathi crime news, pune crime news

पुणे : भीमा नदीपात्रात अगोदर तीन मृतदेह सापडले. त्यानंतर पुन्हा एक मृतदेह तरंगताना दिसला. हे मृतदेह नदीपात्रातून काढल्यानंतर पुढे आणखी तीन मृतदेह आढळून आले. एकामागोमाग सात मृतदेहांमुळे पोलिसही चक्रावून गेले. नक्की काय प्रकरण आहे ते त्यांनाही समजेना. आत्महत्या तर नाही, हे प्राथमिक अंदाजाने स्पष्ट झाले. मात्र, दुसरीकडे निघोज परिसरातून सात जण बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. तपास करताना अनेक शक्यता व्यक्त केल्या गेल्या. त्यातूनच मुलाच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने नात्यातीलच सात जणांना यमसदनी पाठविल्याचे उघड झाले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या तपासाचे धागेदोरे उलगडले.

प्राथमिक माहितीवरून पोलिसांना सर्वांची आत्महत्या असल्याचे वाटत होते. एकाच वेळी तीन मृतदेह आढळल्याने माध्यमांमध्ये बातम्यांचा सपाटा सुरू झाला. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते तिघेही एकाच घरातील असल्याचे समजले. नंतर केलेल्या शवविच्छेदन अहवालात या तिघांच्या मृत्यूचे कारण पाण्यात बुडाल्यामुळे झाला होता, असे समोर आले. चौथा मृतदेह सापडल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा संशय बळावला. दुसरीकडे, निघोज परिसरातून सात जणांचे कुटुंब मिसिंग असल्याचे समोर आले. त्यातील चार जण तर सापडले होते; पण अजून तीन जण बाकी होते. पोलिसांनी भीमा नदीत युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पुढे दीड किलोमीटरवर राहिलेले तीन मृतदेह सापडले. मृतांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आणि गळा दाबल्याचे पुढे आले. निघोज व परिसरातील तपासातून फारसे काही पुढे आले नाही.

...अन् पोलिसांना संशय पक्का झाला

चौकशीसाठी पोलिसांनी मृतांच्या जवळच्या लोकांना यवत पोलिस स्टेशनला आणले. त्यामध्ये मृताचे चुलतभाऊ अशोक कल्याण पवार एकदम आत्मविश्वासाने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. मृत मोहन उत्तम पवार आणि त्यांचे कुटुंब आम्हाला नेहमी त्रास द्यायचे. त्यांचे हे नेहमीचे आहे. ते रात्री कधी निघून गेले आम्हाला माहीत नाही. त्यांच्या मुलाने एक मुलगी पळवून आणली. त्यामुळे ते निघोज परिसर सोडून गेले, असे तो सांगत होता. मृताच्या मुलाने गावातील एका मुलीला पळवून नेल्याने त्या कुटुंबाने मृतांच्या घरी येऊन धमकी दिली होती. त्यामुळेच घाबरून त्यांनी आत्महत्या केली असेल, असे अशोक पवार याने सांगितले. ही सर्व माहिती देत असताना ती व्यक्ती एकदम विश्वासाने बोलत होती.

त्यावेळी पोलिसांना काही प्रश्न पडले ते असे-

- ज्यांना आत्महत्या करायची होती, ते घरातील सामान घेऊन का गेले?

- जरी त्यांनी रस्त्यात ठरवलं की, आत्महत्या करायची तर ते सामान कुठे गेले?

- आत्महत्या करण्यासाठी इतक्या लांब का आले?

असे आले समाेर कारण...

त्याच वेळी पुणे शहर पोलिसांत एक अपघाताचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यामध्ये अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजयचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद होती. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मृत मोहन उत्तम पवार यांचा मुलगा अनिल हा धनंजयसोबत होता. त्यामुळे अनिलवर अशोक पवार आणि त्यांच्या भावांचा डोळा होता. या गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाला गती आली. जी व्यक्ती पोलिसांनी एवढ्या विश्वासाने उत्तरे देत होती, तीच मुख्य आरोपी होती, हे नंतर समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आरोपींनी सामूहिक हत्याकांड घडवून आणले होते. आरोपींमध्ये अशोक कल्याण पवार (वय ३९), शंकर कल्याण पवार (वय ३७), श्याम कल्याण पवार (वय ३५), प्रकाश कल्याण पवार (वय २४) व कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५) यांचा समावेश आहे. हे सर्व जण भाऊ-बहीण असून ते हे मृत मोहन उत्तम पवार यांचे चुलतभाऊ होत.

कसा घडला हत्याकांड?

निघोजने रात्री साडेनऊच्या सुमारास ते बीडला पिकअपने जाण्यासाठी निघाले. आरोपीचा मुलगा धनंजयचा मृत्यू आणि मृताचा फरार मुलगा अनिल या विषयावर चर्चा करण्यासाठी ते सर्व जण बीडला निघाले होते. निघोजजवळ गाडी डिझेल भरण्यासाठी थांबली. सगळे जण गाडीच्या पाठीमागे हौदात बसले होते. गाडी नगर- पुणे महार्गावरील कानिफनाथ फाट्याकडून केडगाव-चौफुल्याकडे निघाली. या रस्त्यावरच चालत्या गाडीत या सर्वांना गळा दाबून मारून टाकले. रात्री १ वाजता सर्वांचे मृतदेह पुलावरून नदीत टाकले. मृत मोहन उत्तम पवार (वय ४५), पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई (वय ४०), मुलगी राणी फुलवरे (वय २४), जावई श्याम फुलवरे (वय २८), नातू रितेश (वय ७), छोटू (वय ५), कृष्णा (वय ३) यांचा शेवटचा प्रवास ठरला. आरोपींनी ६ जणांना गळा दाबून मारले होते. तर सर्वांत लहान असणारा कृष्णा शांत बसल्याने त्याचा गळा दाबला नव्हता. आरोपींनी सर्व सहा मृतदेह भीमा नदीत टाकल्यानंतर कृष्णालाही जिवंतच पाण्यात टाकले होते.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस