शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

रिक्षा घरातच, एजंटच्या आशीर्वादाने ‘रोड टेस्ट’ शिवाय पास होताहेत रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 11:53 IST

प्रसाद कानडे पुणे : ‘रोड टेस्ट’ न घेताच अथवा ‘रोड टेस्ट’मध्ये नापास झालेल्या रिक्षा एजंटमार्फत आल्यानंतर त्यांना तीनशे रुपयांच्या ...

प्रसाद कानडे

पुणे : ‘रोड टेस्ट’ न घेताच अथवा ‘रोड टेस्ट’मध्ये नापास झालेल्या रिक्षा एजंटमार्फत आल्यानंतर त्यांना तीनशे रुपयांच्या बदल्यात पास केले जात आहे. नापास होण्यापेक्षा एजंटांना तीनशे रुपये देणे हे कमी त्रासाचे अथवा वेळ वाचविणारे असल्याने रिक्षाचालक एजंटांना तीनशे रुपये देऊन ‘रोड टेस्ट’मध्ये पास होत आहेत. फुले नगर आरटीओ असो की दिवेघाट आरटीओ असो सर्वच ठिकाणी हा प्रकार सर्रास घडत आहे. एजंटचा आशीर्वाद असल्याने घरासमोर थांबलेली रिक्षाही ‘रोड टेस्ट’मध्ये पास होत आहे.

रिक्षा भाडे वाढल्यानंतर नव्या दराप्रमाणे रिक्षा मीटरचे कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत पुण्यातल्या जवळपास वीस हजार रिक्षांचे मीटर अपडेट करण्यात आले. रिक्षातील मीटर कॅलिब्रेशन करताना दोन प्रकारे मीटरची चाचणी केली जाते. यात पहिल्यांदा ज्या कंपनीचे मीटर रिक्षात बसविले आहे त्याची चाचणी घेऊन मग त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. यानंतर आरटीओच्या ‘टेस्ट ट्रॅक’वर मोटार वाहन निरीक्षकांच्या उपस्थितीत रोड टेस्ट घेतली जाते. या चाचणीत नापास होणारे अथवा ज्यांना अशाप्रकारची टेस्टच द्यायची नाही, अशी मंडळी परिसरातील एजंट गाठतात. त्यानंतर ‘लक्ष्मीदर्शन’ केल्यावर एजंटकडून आलेल्या फॉर्मवर उपस्थित मोटार वाहन निरीक्षक कोणतीही चाचणी न घेताच सही करतो. याचाच अर्थ रिक्षा ‘रोड टेस्ट’मध्ये पास होते.

टेस्टमध्ये काय पाहतात :

पुण्यात पाच ठिकणी रोड टेस्टचे काम होते. रोज सुमारे ४०० ते ५०० रिक्षांची चाचणी घेतली जाते. आपला क्रमांक लवकर यावा, यासाठी रिक्षाचालक पहाटे पाच-सहा वाजताच चाचणी केंद्रावर जमतात. ट्रॅकवर थांबलेले निरीक्षक मीटर दीड किलोमीटर धावल्यानंतर २२ रुपये व १.६ किलोमीटर प्रवास केल्यावर २४ रुपयांचा आकडा मीटरवर येतो का, हे पाहतात. यात फरक पडला तर संबंधित रिक्षा चाचणीत नापास झाल्याचा शेरा मिळतो. मग रिक्षा चालकाला दुसऱ्या दिवशी पुन्हा चाचणीसाठी यावे लागते. हे टाळण्यासाठी तीनशे रुपयांची ‘दक्षिणा’ देऊन रिक्षाचालक चाचणीत पास होतात.

‘३ नारळ’ असा आहे कोड

“एजंट यासाठी ‘तीन नारळ’ असा कोड वापरतात. याचा अर्थ तीनशे रुपये. रिक्षा चालकाने पैसे दिल्यावर अधिकारी रोड चाचणी न घेताच रिक्षा पास करतात. पैसे मिळावे यासाठीसुद्धा चाचणीत ‘फेल’ केले जाते. मीटर कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मीटर, टायरमधली हवा, टायरची झीज आदी कारणांमुळे मीटरच्या अचूकतेमध्ये १९-२० टक्के फरक पडतोच. आरटीओ प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे.”

- आनंद अंकुश, सचिव, आम आदमी रिक्षाचालक संघटना

“रिक्षाच्या मीटरचे कॅलिब्रेशन केल्यानंतर नियमाप्रमाणे चाचणीसाठी गेलो असता, एक रुपया कमी-जास्त आल्याने आत्तापर्यंत तीनवेळा मला चाचणीत फेल करण्यात आले. यानंतर एका दलालाने माझ्याकडून तीनशे रुपये घेऊन चाचणीत पास करून दिले. मी याची लेखी तक्रार दिली आहे.”

- बळीराम कांबळे, तक्रारदार रिक्षाचालक

या संदर्भात आरटीओची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी अधिकृत स्पष्टीकरण देणे टाळले.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड