शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

पृथ्वीवर जन्माला येऊन आपण चूक केलीय! अतुल कुलकर्णींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 4:57 PM

वडाच्या झाडाखाली निसर्गशाळा पुस्तकाचे प्रकाशन...

पुणे : आपण पृथ्वीवर जन्माला येऊन चूक केली आहे. कारण येथील सर्व पर्यावरण आपण नष्ट करीत जात आहोत. जे घेत आहोत, त्या प्रमाणात आपण देत नाही. नुसतं घेत आहोत. आता आपण केलेली चूक पुढच्या पिढीला भोगावी लागणार आहे. म्हणून त्यांना निसर्ग शिक्षण देऊन संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केले.

शिक्षक-पालक यांच्याकरिता तयार केलेल्या निसर्गशाळा या मार्गदर्शक पुस्तक संचाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी भांडारकर संस्थेत झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत होते. आयकाॅस संस्थेच्या केतकी घाटे, मानसी करंदीकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ग्राममंगल संस्थेच्या सहयोगाने आणि डायमंड प्रकाशनाने ते प्रकाशित केले. ग्राममंगलच्या प्राची नातू उपस्थित होते. केतकी घाटे व मानसी करंदीकर यांनी आपल्या २० वर्षांतील पर्यावरणविषयक कामाचा आढावा घेतला.

अतुल कुलकर्णी म्हणाले, निसर्गावर पुस्तक लिहून चालणार नाही. तसेच केवळ शिक्षकही चालणार नाहीत. कारण निसर्गशिक्षणासाठी पॅशन असलेली माणसं हवीत. पालक, स्वयंसेवक हवीत. अन्यथा पुस्तकं तर धूळ खात पडलेली आहेतच. त्यात आणखी याची भर पडेल. निसर्ग संवर्धनाचे पॅशनचे मिशन व्हायला हवं.

निसर्गावरचं प्रेम काय आहे हो? प्रथम निसर्गप्रेमींनी जंगलात जायचे थांबविले पाहिजे. जर एखादा पेशंट आयसीयूमध्ये असेल, तर आपण तिथे बाहेर थांबून कोणाला आत सोडत नाही. तसेच निसर्गात न जाता शहरातील लोकांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यासाठी काम केले पाहिजे. केवळ निसर्गात फोटो काढणं म्हणजे निसर्गप्रेम नव्हे, निसर्गात कोणाला जाऊ न देणे म्हणजे निसर्गप्रेम होय, असेही अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

विवेक सावंत म्हणाले, शाळा निसर्गासारखी हवी. निसर्ग हीच शाळा भविष्यात असेल. हे पुस्तक भिंतीची शाळा पाडून टाकणार आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट माणूस घडविणं आहे. आता पर्यावरणावर अरिष्ट आलंय. ग्रेटाचे ऐकून एक कोटी मुलांनी शाळा सोडली आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट हवं की आम्ही निसर्गावर आक्रमण करणार नाही. शोषण करणार नाही तर त्याचे दोहन करणार. ज्ञानासाठी कृती करावी लागते. कृती करणं आवश्यक आहे. शिक्षणशास्त्री लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे निसर्गाचा वास्तुपाठ आहे.

कोडिंग कोडिंग करत बसू नका !

सध्या निसर्गविषयक बुद्धिमत्ता निर्माण व्हायला हवी. कारण हवामान बदलावर आपल्याला विजय मिळवायचा आहे, अन्यथा त्याची किंमत चुकवावी लागेल. या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी भविष्यात ग्रीन काॅलर जाॅब निर्माण होतील. त्यामुळे त्यासाठी काम करायला हवे. केवळ कोडिंग कोडिंग करीत बसू नये, असे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAtul Kulkarniअतुल कुलकर्णी