शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

अत्रे यांचे सोपे-उत्स्फूर्त लिखाण आजही वाचकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 6:00 AM

साहित्यिक द. मा. मिरासदार : आचार्य अत्रेंच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त साधला संवाद

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : ‘विनोदी साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आचार्य अत्रे यांचे मोलाचे योगदान आहे. अत्रे म्हणजे विनोदाचा धबधबा होते. पिढ्या बदलल्या तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही, ही नस आचार्य अत्रेंनी बरोबर ओळखली होती. त्यांचे लिखाण सहजसोपे, उत्स्फुर्त असल्याने आजही वाचकांना आपलेसे वाटते,’ या शब्दांत ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

आचार्य अत्रे यांच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘लोकमत’ने ब्याण्णव वर्षिय द. मा. यांच्याशी संवाद साधला. या वेळी द. मा. म्हणाले, आचार्य अत्रेंनी लेखनात कमालीचे वैविध्य जपले. त्यांनी कवितेपासून सुरुवात केली आणि नंतर विडंबनाकडे वळले. गडकरी यांच्यानंतर उत्तम नाटककार रंगभूमीला मिळाला नव्हता. अत्रेंनी रंगभूमीवरील ही उणीव भरुन काढली. एकदा बालमोहन नाटक मंडळीचे दामूअण्णा जोशी अत्रेंकडे आले. ते म्हणाले, ‘अत्रे, लोकांना नाटकामध्ये नवं काहीतरी हवं आहे. बघा प्रयत्न करु.’ अत्रे शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांनी मुलांसाठी एक-दोन नाटकं लिहिली होती. जोशींच्या विनंतीनंतर त्यांनी लिहिलेले पहिले नाटक म्हणजे ‘साष्टांग नमस्कार’! हे नाटक विडंबनात्मक होते. औंधचे राजे त्या वेळी या नाटकाचा प्रचार करत असत. संस्थानात त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ हा उत्तम व्यायाम आहे, असे सांगत असत. त्यांची थट्टा करण्यासाठी आचार्य अत्रेंनी हे नाटक लिहिले. त्यातील रावबहादूर हे पात्र खूप गाजले.सर्वसामान्यांसाठीचा विनोद अत्रेंकडून शिकलो‘मला कॉलेजला असल्यापासून आचार्य अत्रेंचे प्रचंड आकर्षण होते. बीएचे शिक्षण घेताना प्राध्यापक वाटवे आम्हाला अत्रे यांच्या खंडाळयातील बंगल्यावर घेऊन गेले होते. तेव्हा त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांची खूप भाषणेही मी ऐकली. अत्रेंचे नाटक, चित्रपट, साहित्य यांवर मी स्वतंत्रपणे व्याख्याने दिली आहेत. सामान्य लोकांनाही कळेल, असा विनोद असावा, हे मी अत्रेंकडून शिकलो.’ - द. मा. मिरासदार

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे